SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश : विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे प्रतिपादन; गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

schedule15 Sep 25 person by visibility 407 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच 100 टक्के प्रवेश झाले आहेत. आमच्या संस्थेबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेली विश्वासार्हता यामुळे अधोरेखित झाली असून हाच विश्वास आणखी वाढवण्यासाठी  सातत्यपूर्ण प्रयत्न करूया, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदर ऋतुराज पाटील यांनी केले.

 डॉ.डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजीत गुणवंत विद्यार्थी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ.डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक 100 टक्के प्रवेश झाले आहेत. दहावीमध्ये चांगले  गुण मिळवलेल्या  विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकला पसंती दिली असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले,  पॉलिटेक्निकचे प्राचार्य, प्राध्यापक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वाच्या योगदानामुळे डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची विश्वासार्हता दरवर्षी वाढत आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी लावलेल्या छोट्याशा शैक्षणीक रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. त्यामुळं  प्रत्येकाचीच जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी जे जे काही करता येईल ते सातत्याने करूया. 

प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाबाबत सर्व स्टाफकडून अचूक मार्गदर्शन केले जाते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या पाठबळामुळे वर्षभर  विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्याची पोहचपावती 100 टक्के ॲडमिशनमधून मिळाली आहे.  

यावेळी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेणाऱ्या  सत्यम गायकवाड, शताक्षी शिंदे, आयुष चाळके, पार्थ शेलार, चैत्राली चौगले व अजित भवड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ. पी. के. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. सुजाता शिंदे, प्रा. शितल साळोखे, प्रा. राज अलासकर आदींसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes