SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवसेना मदत कक्ष कोल्हापूरतर्फे आरोग्य दूत राजेंद्र मकोटे यांचा सत्कारसेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबत आवश्यक जागेचा प्रस्ताव आठ दिवसांत कोल्हापूर महापालिकेकडे द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरडीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागतील १६० विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर्सवारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार : एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना दिलासाकोल्हापूर : 60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठावकोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात 4830 नागरीकांची तपासणीमुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला पुन्हा तूप पूरवठ्याची ऑर्डर; चालू आर्थिक वर्षात २८० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार : अरुण डोंगळेकोल्हापूर हायकर्सची पवित्र जल संकलन मोहीम - २०२५४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यताकोल्हापूर महापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा : 'आप'ची बैठकीत मागणी

जाहिरात

सहकारातील 'विश्वास'पूर्ण वाटचालीचा बुलंद आवाज 'आबाजी' !

schedule13 Apr 25 person by visibility 510 categoryसामाजिक

गेली ५० वर्षे राजकीय, सामाजिक, शिक्षण, कृषी, दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे जनसामान्यांचे नेते, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांच्या  अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त ...

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ हा वासरु संगोपन कार्यक्रम राबवणारा देशातील सहकार क्षेत्रातील सर्वात पहिला दूध संघ आहे. यासाठी संघाचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक  विश्वास पाटील यांनी वासरू संगोपन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी दूध उत्पादकांना प्रेरीत केले आहे. याची विशेष नोंद NDDB ने घेऊन गोकुळचा हा कार्यक्रम संपूर्ण देशातील इतर दूध संघांपुढे एक आदर्श उदाहरण म्हणून ठेवला आहे. 

▪️सामाजिक जबाबदारी
आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात  विश्वास पाटील यांनी वयाची साठी ओलांडलेल्या जेष्ठ दूध उत्पादकांसाठी पेन्शन योजना जाहीर केली. या योजनेत दूध उत्पादकाचा ५०% आणि गोकुळ दूध संघाकडून ५०% आर्थिक सहभाग ठेवण्यात आला आहे. आता 'गोकुळ'शी संबंधित सर्व दूध उत्पादक एल. आय. सी. मार्फत याचा आर्थिक लाभ घेत आहेत.

▪️तालुका पातळीवरील कार्य
अ) विश्वास पाटील, १९७६-७७ मध्ये करवीर पंचायत समिती सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून आले आणि पुढे सलग १३ वर्षे सदस्य राहिले.
ब) त्यांच्या करवीर पंचायत समितीच्या कार्यकाळात, त्यांनी १२५ मोटारसायकलींची रॅली काढली आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार केला.

जिल्हा आणि तालुका स्तरावरील सहकार क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले.
अ) सन १९८६ ते आजतागायत गोकुळ दूध संघाचे सलग ३९ वर्षे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 
ब)  विश्वासराव पाटील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूर अर्थात गोकुळच्या अध्यक्ष पदाची ८ वर्षे धुरा सांभाळली.

▪️गोकुळचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ खालीलप्रमाणे आहे...
०६.१२.२००४ ते ०२.१२.२००६ पहिला कार्यकाळ
०७.०५.२०१५ ते १४.०१.२०१९ दुसरा कार्यकाळ
१४.०५.२०२१ ते २५.५.२०२३ तिसरा कार्यकाळ.

क) कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील अग्रगण्य कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यावर सन १९९९-२००५ या कार्यकाळात संचालक म्हणून निवड झाली. या दरम्यान २००२ सालात त्यांनी या कारखान्याचे अध्यक्षपदही भूषविले.
ड) सन १९८१ मध्ये रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ, कोल्हापूर या संस्थेवर संचालक म्हणून निवड झाली. तेव्हापासून आजतागायत ४४ वर्ष ते संचालक आहेत.
इ) कुंभी-कासारी सहकारी बैंक कुडित्रे येथे १९८९ साली ते संचालक म्हणून निवडून आले पुढे पाच वर्ष या बँकेवर ते संचालक म्हणून राहिले.
फ) कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेडचे संचालक गेली २७ वर्ष ते संचालक आहेत.
ग) कोल्हापूर जिल्हा गोकुळ ग्रामीण पतसंस्थेचे संचालक पद गेली १७ वर्ष ते सातत्याने भूषवित आहेत.
ह) शाहू शेतकरी सहकारी संघाचे संचालक पद गेली १० वर्षे सातत्याने भूषविले आहे.

▪️गावपातळीवरील सहकारी संस्थांची स्थापना
गाव पातळीवर नवीन शिक्षण संस्था, नळ पाणी पुरवठा संस्था तसेच सर्व सामान्यांच्या उपचारासाठी सरकारी दवाखाने उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

▪️ते खाली नमुद केलेल्या विविध संस्थांच्या संस्थापक आणि अध्यक्षपदी आहेतः
अ) सन १९७८ मध्ये शिरोली दुमाला या गावी बलभीम विकास सेवा संस्थेची त्यानी स्थापना करून पुढे १७ वर्षांहून अधिक त्यांनी या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
ब) सन १९७८ मध्ये शिरोली दुमाला येथे श्री शाहू छत्रपती सहकारी दूध संस्येची स्थापना केली
क) सन १९८४ मध्ये शिरोली दुमाला येथे शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेची स्थापना केली.
ड) सन १९८१ मध्ये शिरोली दुमाला येथे श्री हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.
इ) सन १९९५ मध्ये शिरोली दुमाला येथे करवीर भाजीपाला खरेदी-विक्री संघाची स्थापना केली
फ) सन १९९६ मध्ये शिरोली दुमाला येथे श्री हनुमान नागरी सहकारी दूध संस्थेची स्थापना केली.
ग) सन १९९८ मध्ये शिरोती दुमाला येथे श्री विश्वास नारायण पाटील फाऊंडेशनची स्थापना केली.

▪️राजकीय आणि समाजकार्य
त्यांच्या शैक्षणिक जीवनात त काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने प्रेरीत झाले आणि त्यांनी राजकीय व सामाजिक कार्याला सुरुवात केली.
• काँग्रेस प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग देत विधिमंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रातील निवडणुकींच्या प्रचारात ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत.

• १९७३ मध्ये त्यांची शिरोली दुमाला ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी निवड झाल्यावर पुढील केवळ पाचच वर्षांत त्यांनी गाव सुधारणेच्या विविध योजना राबवल्या.
ते कोल्हापूर कॉंग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.
करवीर तालुका युवक काँग्रेस (आय) च्या अध्यक्षपदीही ते विराजमान होते.

▪️सामाजिक आणि इतर कार्य
अ) सन १९९८ मध्ये शिरोली दुमाला येथे श्री दत्त मंदिराची स्थापना केली.
ब) विश्वासराव नारायण पाटील फाउंडेशन तर्फे दुष्काळी भागातील पाण्याची गरज पूर्ण
क) कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या शेतकन्यांच्या निवासस्थानाची प्रलंबित मागणी मंजूर करुन त्याची अंमलबजावणी केली.
ड) सन २००३-०४ मध्ये शिरोली दुमाला येथे त्यांनी ज्ञान साधना शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून इंग्रजी बालवाडी सुरू केली. तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बसची विशेष व्यवस्था केली.
इ) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या पहिल्य कार्यकाळात वासरू संगोपन योजना आयोजित करुन कार्यक्षमपणे राबविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. या योजनेअंतर्गत ७ लाख १४ हजार वासरांची यशस्वी नोंद गोकुळमध्ये झाली आहे. यामुळे दररोज २ ते २.५ लाख लिटर दूधवाढ होण्यास मदत झाली आहे. वासरू संगोपन योजना राबविण्याच्या कार्यक्रमातील सात्तय कायम ठेवले असल्याने आता ५ लाख दूध उत्पादक गोकुळच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या कार्याचा गौरव म्हणून गोकुळला राष्ट्रीय उत्पादकता परिषद, नवी दिल्ली पांचा नुकताच राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार प्राप्त झाला आहे.
फ) २००५ आणि २००७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीवेळी गोकुळच्या पूरग्रस्त दूध उत्पादकांना त्यांनी जनावरांचे पशुखाद्य व इतर स्वरुपात २० लाख रुपयाच्या आर्थिक निधीचे गोकुळ मार्फत वाटप केले. त्यामुळे दूध उत्पादकांना कठीण काळात आर्थिक दिलासा मिळाला.
ग) २००५ आणि २००७ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीवेळी गोकुळच्या पूरग्रस्त दूध उत्पादकांना त्यांनी जनावरांचे पशुखाद्य व इतर स्वरुपात २० लाख रुपयाच्या आर्थिक निधीचे गोकुळ मार्फत वाटप केले. त्यामुळे दूध उत्पादकांना कठीण काळात आर्थिक दिलासा मिळाला.
ह) विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ ५०० युवकांना विविध शासकीय/सहकारी संस्थेमध्ये नोकरी देऊन त्यांच्या कुटूंबाची अर्थिक उन्त्रत्ती साधली.

▪️सन्मान/पुरस्कार/निवड
अ) मार्च २००२ मध्ये भारतीय आर्थिक विकास आणि संशोधन संघटना, नवी दिल्ली यांचा 'भारतीय उद्योग रत्न' पुरस्कार प्राप्त झाला.
ब) ऑगस्ट २००२ मध्ये नवी दिल्ली येथील इंडियन फर्टिलायझर कंपनीचे (इफको) ते सदस्य झाले.
क) काठमांडू येथे नेपाळ सरकार आणि भारत सरकार आयोजित यांच्या संयुक्त परिषदेत 'द इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलियम अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes