+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule05 Nov 21 person by visibility 1295 categoryसंपादकीय

कोरोनारुपी महामारीमुळे आलेली गेले दीड-पावणेदोन वर्षांची मरगळ झटकून सोमवारपासून प्रकाश पर्व सुरू झाले आहे. दिवाळीचा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही SMP हे न्युज पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू करत आहोत.

गेले दीड-पावणेदोन वर्ष सारे जग कोरोनारुपी भीतीच्या सावटाखाली होते. भारतालाही याचा चांगलाच फटका बसला. यात महाराष्ट्र तर आघाडीवर होता. अनेकांनी जीव गमावला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सततच्या लॉक डाउनमुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. उद्योग धंदे मान टाकू लागले. सप्टेंबरपासून दुसर्याय लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनलॉक झाल्याने उद्योग धंदे सुरू झाले असून, अर्थ व्यवस्था सावरू लागली आहे. लसीकरणातही आघाडी घेतल्याने संभावित तिसऱ्या लाटेची भीतीही जनतेच्या मनातून कमी झाली आहे. गणेशोत्सव, दसरा कोणत्याही विघ्नाविना पार पडले. आता प्रकाशाचा सण दिवाळी येत आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. तिमिरातुन तेजाकडे असा भास होत आहे. उद्योग धंद्यांची चक्रेही धाऊ लागली आहेत. मात्र, अजूनही काही धडपडत आहेत, वाट चुकत आहेत. अशांना दिशा दाखविण्यासाठी दिशादर्शकाची गरज असते. याच भूमिकेतून या प्रकाश पर्वात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर SMP न्युज हे पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झाले. 

निष्पक्ष, परखड बातमी देण्याबरोबरच आबालवृद्ध यांच्यासह तरुणाईच्या समस्या मांडण्यावर भर देण्याचा प्रयत्न असेल. करवीरनिवासीनी अंबाबाई, दक्खनचा राजा जोतिबाची कृपा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू राजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरोगामी विचार अंगिकारलेल्या करवीरनगरीत सहकार चांगलाच रुजला आहे. राजकीयदृष्ट्याही राज्यात कोल्हापूरने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. इथली कृषिसंपदा राज्यात नव्हे तर देशात आदर्शवत अशी आहे. या सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या पोर्टलद्वारे केले जाईल. त्यासाठी गरज आहे कोल्हापूरकरांच्या पाठबळाची. ‘फक्त लढ म्हणा’ म्हणण्याची.