+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस adjustघाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर adjustकोल्हापुरातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर adjustकारगिल ऑपरेशन विजय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक : कॅप्टन डॉ. अमित रेडेकर; के.एम.सी. कॉलेज व गोखले कॉलेज यांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा adjustडीकेटीईच्या १४ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड adjustबगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
1000867055
1000866789
schedule05 Nov 21 person by visibility 1255 categoryसंपादकीय

कोरोनारुपी महामारीमुळे आलेली गेले दीड-पावणेदोन वर्षांची मरगळ झटकून सोमवारपासून प्रकाश पर्व सुरू झाले आहे. दिवाळीचा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही SMP हे न्युज पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत रुजू करत आहोत.

गेले दीड-पावणेदोन वर्ष सारे जग कोरोनारुपी भीतीच्या सावटाखाली होते. भारतालाही याचा चांगलाच फटका बसला. यात महाराष्ट्र तर आघाडीवर होता. अनेकांनी जीव गमावला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सततच्या लॉक डाउनमुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. उद्योग धंदे मान टाकू लागले. सप्टेंबरपासून दुसर्याय लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनलॉक झाल्याने उद्योग धंदे सुरू झाले असून, अर्थ व्यवस्था सावरू लागली आहे. लसीकरणातही आघाडी घेतल्याने संभावित तिसऱ्या लाटेची भीतीही जनतेच्या मनातून कमी झाली आहे. गणेशोत्सव, दसरा कोणत्याही विघ्नाविना पार पडले. आता प्रकाशाचा सण दिवाळी येत आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. तिमिरातुन तेजाकडे असा भास होत आहे. उद्योग धंद्यांची चक्रेही धाऊ लागली आहेत. मात्र, अजूनही काही धडपडत आहेत, वाट चुकत आहेत. अशांना दिशा दाखविण्यासाठी दिशादर्शकाची गरज असते. याच भूमिकेतून या प्रकाश पर्वात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर SMP न्युज हे पोर्टल कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झाले. 

निष्पक्ष, परखड बातमी देण्याबरोबरच आबालवृद्ध यांच्यासह तरुणाईच्या समस्या मांडण्यावर भर देण्याचा प्रयत्न असेल. करवीरनिवासीनी अंबाबाई, दक्खनचा राजा जोतिबाची कृपा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू राजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरोगामी विचार अंगिकारलेल्या करवीरनगरीत सहकार चांगलाच रुजला आहे. राजकीयदृष्ट्याही राज्यात कोल्हापूरने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. इथली कृषिसंपदा राज्यात नव्हे तर देशात आदर्शवत अशी आहे. या सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या पोर्टलद्वारे केले जाईल. त्यासाठी गरज आहे कोल्हापूरकरांच्या पाठबळाची. ‘फक्त लढ म्हणा’ म्हणण्याची.