SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

schedule25 Jul 26 person by visibility 326 categoryदेश

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नीट (NEET-UG) परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेत अनियमितता आढळल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता आणि परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. याशिवाय, पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
२१ जून २०२६ रोजी २0 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडली आणि १६ जुलै रोजी निकालही जाहीर झाला. मात्र, गेल्या १० दिवसांत जंतरमंतरसह देशभरात पेटलेल्या आंदोलनामुळे आणि राष्ट्रविरोधी शक्तींकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ नये, तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य कोलमडू नये म्हणून आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  देशाच्या युवा पिढीच्या आकांक्षा आणि न्यायोचित अपेक्षांचा आपण आदर करत असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. परीक्षा माफियांच्या विळख्यातून गुणवान विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून आपण कधीही पाठ फिरवली नसल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.
 या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी देशपातळीवर आक्रमक पवित्रा घेतला असून, बिहारसह अनेक भागांत तीव्र आंदोलने उसळली आहेत. राष्ट्रसेवा हीच आपल्या आयुष्याची सर्वोच्च प्राथमिकता असून, ओडिशाची जनता आणि देशाच्या तरुणांच्या विकासासाठी आपण पुढेही कटिबद्ध राहणार असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes