SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभकोलोली येथील महिला खुनाचा गूढ उकलला; अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानेच केली होती हत्या, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक!करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदनराष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी: वाहन नोंदणीसाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ!वसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!आधुनिक भारताचे शिल्पकार: पंडित जवाहरलाल नेहरूगणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

जाहिरात

 

करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

schedule27 May 26 person by visibility 142 categoryराजकीय

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेषतः करवीर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील हजारो वृद्ध, अपंग व विधवा लाभार्थ्यांना गेल्या २ ते ३ महिन्यांपासून पेन्शन मिळाली नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करवीरचे तहसीलदार यांना  निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी पेन्शन योजनेचे सुमारे ६९ हजार ८८३ आणि श्रावणबाळ योजनेचे १ लाख २४ हजार ४७३ लाभार्थी आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसत अनेक वयोवृद्ध लाभार्थी बँकेत चकरा मारत आहेत, मात्र पेन्शन जमा न झाल्याने त्यांना औषधोपचारासाठी व दैनंदिन खर्चासाठी पैशांची तीव्र टंचाई भासत आहे. तसेच, महा ई-सेवा केंद्रामध्ये 'हयातीच्या दाखल्यासाठी'  वृद्धांची मोठी गर्दी होत असून त्यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करावा आणि अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, डिसेंबर २०२४ च्या 'डी.बी.टी.'  नियमांमुळे बँक खाते लिंक करण्याच्या प्रक्रियेत ज्या लाभार्थ्यांची ७ ते ८ महिन्यांची जुनी पेन्शन रखडली आहे, ती देखील शासनाकडून पाठपुरावा करून मिळवून द्यावी, अशी मागणी करवीर तालुका प्रमुख  राजू यादव, जिल्हाप्रमुख  रविकिरण इंगवले, आणि उपजिल्हाप्रमुख  पोपट दांगट व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes