+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपूर निवारणासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरूवात; कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात देण्यात येणाऱ्या मदतकार्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध संघटना, व्यावसायिकांसोबत नियोजन बैठक adjustकोल्हापूर शहरामध्ये आज 609 नागरीकांचे स्थलांतर adjustपुरग्रस्त भागात आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ; आवश्यक ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन adjustनिवारा केंद्रामध्ये नागरीकांना चांगल्‍या सुविधा द्या - प्रशासक के.मंजूलक्ष्मी adjustकाळम्मावाडी योजनेद्वारे आज शनिवारी दुपारपर्यंत कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु adjustकोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 7 हजार 212 क्युसेक विसर्ग; राधानगरी धरणाचे स्वयंचलित 5 दरवाजे खुले adjustअतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना adjustबेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी
1000867055
1000866789
schedule31 Mar 24 person by visibility 217 categoryदेश
मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा 40 ते 42 डिग्री से. राहणार असल्याच सांगण्यात येत आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाने अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी ठिकाणी तापमान वाढेल, असाही अंदाज दिलाय. तर अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.