+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस adjustघाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर adjustकोल्हापुरातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर adjustकारगिल ऑपरेशन विजय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक : कॅप्टन डॉ. अमित रेडेकर; के.एम.सी. कॉलेज व गोखले कॉलेज यांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा adjustडीकेटीईच्या १४ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड adjustबगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
1000867055
1000866789
schedule08 Dec 22 person by visibility 1318 categoryदेश
नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या आरोग्य सुविधेबद्दल तसेच अतिउंचीवर प्रवास करण्यासाठी असलेल्या साधनांच्या सुरक्षेबाबत आणि पायाभूत सुविधांच्या पूूर्ततेबाबत, आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला. यात्रेकरूंच्या सुखद आणि सुलभ प्रवासासाठी रोप वे ची सुविधा लवकरच पूर्णत्वास जाईल. तसेच यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे भरत असल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.

 चारधाम यात्रेतील चार तीर्थक्षेत्र म्हणजे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्हयातील यमनोत्री आणि गंगोत्री, रूद्रप्रयाग जिल्हयातील केदारनाथ आणि चमोली जिल्हयातील बद्रीनाथ... हजारो भाविक दरवर्षी या ठिकाणी जातात. अतिउंचावर ऑक्सिजनची कमतरता असते. शिवाय हवेचा दाब कमी असतो. अतिनिल किरणांची तीव्रता वाढलेली असते. अशावेळी या चारही तीर्थक्षेत्रावर आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज असल्याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा वाढवल्या, तर यात्रेकरूंसह स्थानिक नागरिकांनाही लाभ होईल, असे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत नमुद केले. त्यावर केंद्रीय पर्यटन मंत्री अजय भट यांनी खुलासा केला.

 दरवर्षी चारधाम यात्रेपूर्वी पर्यटन मंत्रालयाकडून आरोग्य विभागाशी संपर्क साधला जातो. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू केली जातात. तसेच यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी चोख व्यवस्था असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान राज्यसभेत बोलताना आज खासदार महाडिक यांनी चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या प्रवास व्यवस्थेविषयी सुध्दा मुद्दा उपस्थित केला. यमनोत्री किंवा केदारनाथला जाण्यासाठी पायी चालत किंवा घोडयावरून अथवा डोलीतून जाण्याचे पर्याय आहेत. मात्र डोली वाहणार्‍या गोरगरीब मजुरांची अवस्था अत्यंत बिकट असते. तर ज्या जनावरांवरून प्रवास केला जातो, त्यांची शारिरीक अवस्था सुध्दा बर्‍याचदा चांगली नसते. या जनावरांना पोटभर खाणेपिणे मिळत नसल्याने, गेल्या वर्षभरात सुमारे ६०० जनावरांचा मृत्यू झालाय. 

अशावेळी केंद्र सरकारकडून केदारनाथ आणि यमनोत्रीसाठी रोप वे सुरू होणार आहे का, आणि होणार असेल तर तो कधी सुरू होईल, याबद्दलची माहिती देण्याची खासदार महाडिक यांनी विनंती केली. त्यालाही पर्यटन मंत्री अजय भट यांनी समर्पक उत्तर दिले. सन २०१३ च्या केदारनाथमधील प्रलयंकारी महापूरानंतर, केंद्र सरकारने झपाटयाने दळणवळणाच्या सुविधा वाढवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कामांवर लक्ष ठेवून असून, चारधाम यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय केदारनाथ आणि हेमकुंडसाहीब या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी केंद्र सरकारकडून रोप वे ची सुविधा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळं चारधाम यात्रा अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्‍वास केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला.