SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत...आता शेतातच समजणार पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव; कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित उपकरण संशोधनाला मिळाले पेटंटखुनाचा गुन्हा उघडकीस; चार आरोपींना अटक; पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगीरी कोल्हापूर : तहसिलदारांकडून प्रलंबित कामे करून देण्यासाठी पाच लाखाची घेतली लाच; पंटरला अटक, शाहूवाडी तालुक्यात खळबळडी.के.टी.ई. मध्ये ‘टेक-सिंपोझियम २५‘ आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धा उत्साहात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सुधारणा करण्यावर भर : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरमहात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठतुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक: डॉ. श्रीरंग गायकवाड‘एलजीबीटीक्यूएआय’ समुदायाला समता, सन्मानाचा अधिकार : कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्केसुनीताचे स्वागत... १७ तासांचा हृदयस्पर्शी प्रवास...

जाहिरात

 

शिरोली-सांगली मार्गावर आणखी किती बळी हवेत? अधिकाऱ्यांकडे कैफियत; 'घोडावत'च्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

schedule11 Sep 24 person by visibility 324 categoryराज्य

जयसिंगपूर : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातून कराच्या रूपाने कोट्यवधीचा महसूल शासनाच्या तिजोरीत जातो. तरीही शिरोली-सांगली 'घात'रुपी महामार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. विद्यार्थ्यांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कोटयवधीचा कर देऊनही मार्गावर मरणयातना भोगाव्या लागत आहेत. दिवसेंदिवस अपघात आणि बळी जात असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर मार्ग दुरुस्त होणार अशी विचारणा करत सुरक्षित मार्गासाठी आता आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा, संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना दिला आहे. 

 सांगली-कोल्हापूर महामार्गाचे प्रचंड दुरावस्था झाली आहे. शिवाय मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने सातत्याने अपघात होत आहेत. अतिग्रे येथील घोडावत विद्यापीठात वीस हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या विद्यार्थ्यांना या महामार्गावरून प्रवास करताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरूस्ती तातडीने करावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनही विद्यार्थ्यांच्यावतीने राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना देण्यात आले. 

  निवेदनात असे म्हटले आहे की, सांगली-कोल्हापूर महामार्ग हा राष्ट्रीय महामार्गात विलीन झाला आहे. गेल्या वर्षाभरापासून या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांबरोबर अनेकांचा बळी गेला आहे. यापूर्वी उद्योगपती संजय घोडावत यांनी उदगांव टोलनाक्यावर आंदोलन करून सुमारे चार तास महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर या महामार्गाची दुरूस्ती झाली होती. 

 सध्याही या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आठ दिवसांत या रस्त्याची खड्डे भरून दुरूस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू.  

    निवेदनावर रितेश शिंदे, सोमनाथ पाटील, शिवम वाघे, तन्वी सोनी, ओम पाटील, वेदांत जोशी, निहाल नाईक, ऋतूजा जाधव, अनिकेत पटेल, निखिल कुंभार, अभिषेक मगदूम, आशिष कोगनाळे यांच्यासह विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. 

▪️बी.ए.आय. डी. एफ.चा पाठिंबा 
विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या या आंदोलनास बिझनेस अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फोरम कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूरच्या सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. विद्यार्थी आणि बी.ए.आय. डी. एफ. च्या माध्यमातून आंदोलन करून याप्रश्नी जाग आणली जाणार आहे.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes