SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उच्च राजकीय-सामाजिक नैतिकतेचे दुसरे नाव म्हणजे डॉ. एन. डी. पाटील: किशोर बेडकीहाळशासनाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन सेवांवरच अवलंबून : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगफुटबॉलच्या रणांगणात आज 'महामुकाबला': मेस्सीच्या जादूची की केनच्या करिष्म्याची गाजणार दहशत?फीफा वर्ल्ड कप २०२६: स्पेनचा दणदणीत विजय; फ्रान्सला धूळ चारत गाठली अंतिम फेरी!जागतिक युवा कौशल्य दिन: भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरणगौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यताशिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार; जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणारराष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.अंबाबाई मंदिराचे जतन-संवर्धन योग्य मार्गावर: पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले पाणीगळतीचे कारण!

जाहिरात

 

कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आता स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस धावणार : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

schedule12 Sep 24 person by visibility 1313 categoryराज्य

 ▪️आठवड्यातील ३ दिवस वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय 

कोल्हापूर : हुबळी ते पुणे या मार्गावर नव्याने सुरू होणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसला, कोल्हापूरचा थांबा देण्यात आला होता. पण त्यामुळे काही नवे वाद निर्माण झाले होते. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापुरातील अन्य काही लोकप्रतिनिधींनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस देण्याची मागणी केली. त्यानुसार आता आठवड्यातील तीन दिवस, कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. १६ सप्टेंबर पासून, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे.

हुबळी ते पुणे या मार्गावर १५ सप्टेंबरपासून नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. हीच गाडी मिरजेहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातील प्रवाशांना घेऊन पुन्हा मिरज मार्गे पुढे जाईल, असे नियोजन करण्यात आले होते. पण या प्रस्तावाला मिरज आणि कर्नाटक मधील अनेक प्रवाशांनी विरोध दर्शवला. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार येत्या १६ सप्टेंबर पासून, आठवड्यातील तीन दिवस, कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर, वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता, कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. तर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता, पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी कोल्हापुरात येईल. 

 मिरज - सांगली - किर्लोस्करवाडी- कराड आणि सातारा या स्थानकांवर ही नवी वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून कोल्हापूरकरांची असलेली मागणी पूर्णत्वास आली आहे. लवकरच कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes