SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरमहानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटमुळे गुणवत्ता वाढणार; डांबर खरेदी थेट हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनी कडूनकोल्हापूर शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महानगरपालिकेची ८ डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठकपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रमऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडॉ. क्रांतीवीर मोरे यांची युवा वैज्ञानिक परिषदेसाठी निवडगोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजराडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये “मिनी हॅकाथॉन २०२५” स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनोखे प्रदर्शनकोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मोफत विधी सेवा सहाय्य विधीज्ञांची नियुक्ती

जाहिरात

 

भारतीय संघ T20 विश्वविजेता, दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

schedule29 Jun 24 person by visibility 531 categoryक्रीडा

नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 World Cup चॅम्पियन बनवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या, त्यानंतर आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 169 धावांवर रोखून सामना जिंकला. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. हा संघ  विश्वचषक T20  चॅम्पियन बनवला आहे.या विजयामुळे 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

 दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. मात्र आफ्रिकेला केवळ 8 धावा करता आल्या. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि भारताचा विजय निश्चित केला.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. डी कॉकने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. स्टब्सने २१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली.

भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 षटकात 20 धावा देऊन तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes