SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये विक्रमी उत्साह : शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणार : इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेकेंद्र सरकारच्या कायद्यानुसार मॅट्रीमोनी वेब साईट्सनी शासनाला माहिती देणे बंधनकारक : गृह राज्यमंत्री योगेश कदमकेन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते अथानी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या २५ फूट उंच पुतळ्याचे अनावरणशनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहार प्रकरणी दोन कर्मचारी अटकेत : गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरसातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण; दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना पंधरा दिवसांची मुदत : मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेभाऊ पाध्ये काळाच्या चौकटी तोडणारा लेखक : श्रीराम पवार

जाहिरात

 

भारतीय संघ T20 विश्वविजेता, दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

schedule29 Jun 24 person by visibility 539 categoryक्रीडा

नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 World Cup चॅम्पियन बनवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या, त्यानंतर आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 169 धावांवर रोखून सामना जिंकला. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. हा संघ  विश्वचषक T20  चॅम्पियन बनवला आहे.या विजयामुळे 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

 दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. मात्र आफ्रिकेला केवळ 8 धावा करता आल्या. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि भारताचा विजय निश्चित केला.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. डी कॉकने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. स्टब्सने २१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली.

भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 षटकात 20 धावा देऊन तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes