SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर : नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेडीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदानगार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शनडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजनतपोवन मैदानावर उद्यापासून सतेज कृषी प्रदर्शनाला होणार प्रारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार उद्घाटन ,तीन फुटाची राधा नावाची म्हैस असणार खास आकर्षणकोल्हापूर महानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटद्वारे विभागीय कार्यालय क्रं.2 अंतर्गत पॅचवर्कची कामे सुरुजागतिक मृदा दिनानिमित्त चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करुया उपक्रमाचे आज जिल्ह्यात आयोजनकोल्हापूर: चिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागूचंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

भारतीय संघ T20 विश्वविजेता, दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

schedule29 Jun 24 person by visibility 532 categoryक्रीडा

नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 World Cup चॅम्पियन बनवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या, त्यानंतर आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 169 धावांवर रोखून सामना जिंकला. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. हा संघ  विश्वचषक T20  चॅम्पियन बनवला आहे.या विजयामुळे 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

 दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. मात्र आफ्रिकेला केवळ 8 धावा करता आल्या. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि भारताचा विजय निश्चित केला.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. डी कॉकने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. स्टब्सने २१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली.

भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 षटकात 20 धावा देऊन तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes