नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 World Cup चॅम्पियन बनवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या, त्यानंतर आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 169 धावांवर रोखून सामना जिंकला. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. हा संघ विश्वचषक T20 चॅम्पियन बनवला आहे.या विजयामुळे 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. मात्र आफ्रिकेला केवळ 8 धावा करता आल्या. हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि भारताचा विजय निश्चित केला.
दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. डी कॉकने 31 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. स्टब्सने २१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावांची खेळी केली.
भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 षटकात 20 धावा देऊन तीन बळी घेतले, तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.