SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण कोल्हापूर महानगरपालिका : मुख्य निवडणूक कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक संपन्नजातिवंत म्हैशींच्या संगोपनातून दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती शक्य : अभिजीत तायशेटे'आप'चे अर्जवाटप उद्यापासून खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर, कोल्हापूरच्या खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय स्तरावर कामगिरीशिवाजी विद्यापीठात गुरूवारी पर्यावरण शिक्षकांसाठी कार्यशाळाडीकेटीईमध्ये न्यूरल स्ट्रीम ऑटोमेशनची अत्याधुनिक संशोधन प्रायोजित प्रयोगशाळा सुरुशूरवीरांच्या देशसेवेचा जिल्ह्याला अभिमान – जिल्हाधिकारी अमोल येडगेदिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना येत्या शुक्रवारी प्रारंभ

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 703 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes