SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
काळाचा ठेवा: 'आंतरराष्ट्रीय अभिलेख दिवस' आणि आपल्या वारशाचे जतनमराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मेघराज राजेभोसले यांच्या 'समर्थ पॅनेल'चा दणदणीत विजयकोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाजागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती व दंडात्मक मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसादसायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रमआयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी विविध विभागांचा घेतला आढावाशिवाजी विद्यापीठात शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पणडी. वाय. पाटील अभियांत्रिकी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना १२५ हून अधिक जॉब ऑफर्सकोल्हापूर पोलिसांचा दणका: घरफोडीचा मास्टरमाइंड टोळीसह जेरबंद, तब्बल १२.४६ लाखांचा ऐवज जप्त!कोल्हापूर पोलीस दलाची मोठी कामगिरी: पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेत वेग आणि आधुनिकीकरण

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 832 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes