SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कस्तुरबा गांधी : त्यागाची आणि धैर्याची मूर्तीभजन , कीर्तन राज्याच्या संस्कृतीचा कणा : मंत्री आशिष शेलार; " चढता सुरज धीरे धीरे " या कव्वालीने महोत्सवास प्रारंभराजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक : मंत्री आशिष शेलारकोल्हापूर जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूशक्तीपीठ विरोधात 23 फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला व्हिएतनाममधील परिषदेत‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ज्ञान, कौशल्य व सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री : संजय बाबरएआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणेम. सु. पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर चर्चासत्र व पुरस्कारआंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन: भाषिक अस्मितेचा उत्सव

जाहिरात

 

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कोणतीच घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय : आमदार जयश्री जाधव

schedule23 Jul 24 person by visibility 761 categoryविदेश

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. अशी टीका आमदार जयश्री जाधव यांनी केले आहे.

 महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प पंतप्रधानानी केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळालेले नाही. अर्थसंकल्पात केवळ दोन राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर देशातील मोठ्या महाराष्ट्र राज्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केंद्रातल्या भाजपाच्या सरकारने केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप खासदारांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. असे आमदार जयश्री जाधव यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes