SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ओंजळ : नवोन्मेषी काव्यानुभूतीचा आविष्कारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची हिवाळी परीक्षा २०२४ चा उच्चांकीत निकालआर्किटेक्चर अभ्यासक्रमाचे नाटा(NATA) परीक्षेचे केंद्र आता वारणेतकर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती गरजेची : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरबारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहनडॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते 'सी.एस.आर हिरो' पुरस्काराने गौरव; नवभारत ग्रुपकडून शैक्षणिक कार्याचा सन्मानमुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमोटर सायकल चोरणाऱ्या एक आरोपी अटक, दोन बालके ताब्यात. दोन बुलेट, दोन स्प्लेंडर मोटर सायकल जप्त विद्यार्थ्यांनो आपल्या ध्येयाबरोबर पालकांची स्वप्नेही पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे; इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांशी साधला संवादराष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी डॉ. प्रल्हाद माने समूह समन्वयक

जाहिरात

 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

schedule27 Dec 24 person by visibility 319 categoryदेश

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ, जेष्ठ राजकारणी डॉ. मनमोहन सिंग यांचे  दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.  एम्समध्ये रात्री ९.५१ वाजता त्यांचे निधन झाले.  गुरुवारी संध्याकाळी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्यांचे निधन झाले. 

  त्यानंतर भारत सरकारच्या वतीने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सरकारद्वारे आयोजित सर्व कार्यक्रम 7 दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय कॅबिनेट मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे.


▪️पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

 नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.  मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे.  त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला ते  प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्र्यांसह विविध सरकारी पदांवर काम केले आणि गेल्या काही वर्षांत  आर्थिक धोरणावर खोल छाप सोडली.  संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अतिशय व्यावहारिक होता.  पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.

पंतप्रधानांनी X वर मनमोहन सिंग यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.  ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझे आणि त्यांच्यात नियमित संभाषण व्हायचे.  राज्यकारभाराशी निगडीत विविध विषयांवर आमची विस्तृत चर्चा व्हायची.  त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता नेहमीच दिसून येत होती.  या दुःखाच्या प्रसंगी, माझ्या संवेदना डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या कुटुंबियांसोबत, त्यांचे मित्र आणि असंख्य प्रशंसक आहेत.  ओम शांती.

▪️मी आज माझे आदर्श, माझे मार्गदर्शक गमावले; राहुल गांधींकडून शोक व्यक्त

काँग्रेस नेते राहुल गांधींनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले “डॉ. मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातील जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहील. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील,


▪️माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहन सिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. मनमोहन सिंह यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल याची काळजी  घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहे, त्याचं मोठं श्रेय डॉ. मनमोहन सिंह यांना आहे. त्यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील..

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes