SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!; विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल, वस्त्रोद्योगास सुगीचे दिवसयंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या पुर्ततेचं आणखी एक पाऊल : खासदार धनंजय महाडिक कोरे अभियांत्रिकीत मेटलॅब विषयावर यशस्वी कार्यक्रमाचे आयोजनबजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग...“देशाच्या जनसांख्यिकीय लाभांशाची पोषकता वाढविण्यासाठी प्रगत अनुदेशन पद्धतीद्वारे कौशल्य निर्मितीची गरज” : प्रा.डॉ.किरणकुमार शर्माशिवाजी विद्यापीठात संत रविदास महाराज जयंतीजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भुदरगड भरारी पथकाची धडक कारवाई; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; उमेदवारावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखलरांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघड, तीन आरोपी अटक.समूहभावाचे खेड्याचे जीवनतत्व भंगल्यानेच सामाजिक प्रश्र्न वाढले : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस

जाहिरात

 

शाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल, वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस

schedule01 Feb 26 person by visibility 103 categoryराजकीय

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह  कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या उद्दिष्ठाला आणि देशाच्या शाश्वत विकासाला वेग देणारा हा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहे

 

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून देशांतर्गत उत्पादन क्षमता, उर्जा सुरक्षा आणि आवश्यक आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. यासह रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, घरगुती खरेदी शक्ती सुधारण्यासाठी आणि नागरिकांना सार्वत्रिक सेवा प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विकास दर वाढला असून, खऱ्या अर्थाने "गरिबी हटाव" च्या दिशेने देशाने वाटचाल अधिक सक्षम केली आहे. विशेषतः चामड्यांची उत्पादने आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त केली असल्याने कोल्हापुरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस येणार आहेत.

एकंदरीत पाहता देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा, शाश्वत विकासाची हमी देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे    आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे . 

 

    

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes