SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमाची सुरुवात ५,२८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटपकोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्तनेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणवि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीपर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील

schedule17 Mar 26 person by visibility 131 categoryराजकीय

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी अत्यंत चुरशीच्या पण उत्साही वातावरणात पार पडली. यामध्ये महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले असून, अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या शिल्पा शशिकांत खोत (सेनापती कापशी, ता. कागल) तर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे तानाजी कृष्णात पाटील (गडमुडशिंगी, ता. करवीर) यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केवळ अर्ध्या तासाच्या प्रशासकीय प्रक्रियेनंतर या निवडीची अधिकृत घोषणा केली.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० सदस्य असल्याने अध्यक्षपद आपल्याच पक्षाकडे खेचून आणण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने राजकीय वर्तुळात मुश्रीफ यांच्या कौशल्याची चर्चा होत आहे. ६८ सदस्यीय सभागृहात महायुतीचे ५१ सदस्य असल्याने त्यांचे पारडे जड होते. 

महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या रसिका पाटील आणि संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते; मात्र गटनेते सुधीर देसाई आणि संग्राम कुपेकर यांच्या विनंतीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

निवडीची घोषणा होताच जिल्हा परिषद परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. कागल आणि करवीर तालुक्याला या निवडीमुळे जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes