SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हातकणंगले तालुक्यातील टोप, कासारवाडी येथील बेकायदेशीर ३७ क्रशर व्यवसायावर महसूल विभागाची धडक कारवाईकोल्हापूर महापालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जुनी कपडे, जुन्या गादयां व सर्व टाकाऊ इलेक्ट्रीक साहित्याचे घरोघरी संकलनशासकीय शिष्यवृत्ती परीक्षा : कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर मधील स्वरा पाटील, अद्वैत पोवार राज्यात पाचवेकोल्हापूरला देशातील पहिला साक्षर जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेआर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनारवंध्यत्वासंदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषदकोल्हापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुका AIMIM पक्ष स्वबळावर लढवणारगुरुपौर्णिमेला धक्कादायक घटना : दोघा विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापकाचा खून कॉमर्स कॉलेजमध्ये दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

महात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ

schedule19 Mar 25 person by visibility 340 categoryसामाजिक

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाले अंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.

डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.

डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल, संशोधक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes