SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्ह्यात 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे, उपमहापौरपदी अँड. अनिल डाळ्या बिनविरोधपर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल: डॉ. सुधीर कुंभार; कोते आदिवासी आश्रमशाळेत विद्यापीठाचा स्कूल कनेक्ट उपक्रमकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजनसेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम आणि प्रथम महिला यांचे दिल्लीकडे प्रयाणविमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमर्पणाच्या भावनेतून ‘अनुलोम’चे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडी वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटनकोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्जडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची आयआयटी व एनआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

जाहिरात

 

महात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ

schedule19 Mar 25 person by visibility 570 categoryसामाजिक

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाले अंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.

डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.

डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल, संशोधक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes