SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजीत यूनिटी मार्चला उत्स्फूर्त प्रतिसादडी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यशसंजय घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरलापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ७५ सायकलपटूंची ७५ किलोमीटर सायकल रॅली क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्कातील २५ एकर जागा द्या; आ. सतेज पाटील यांची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे मागणीवोट चोरी करून सत्तेवर आलेल्या सरकारला; त्यांची जागा दाखवून द्या; बी एम संदीप...योग्य आणि अयोग्य हेच यशस्वी जीवनाचे परिमाण असावे : संदीप वासलेकर; केआयटी च्या ‘अभिग्यान’ व्याख्यानमालेस ८००विद्यार्थ्यांची उपस्थितीशिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरुखासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महानगरपालिका : सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडतीची रंगीत तालीम पार

जाहिरात

 

महात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ

schedule19 Mar 25 person by visibility 485 categoryसामाजिक

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाले अंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.

डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.

डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल, संशोधक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes