लोकसेवेचा नवा संकल्प: उपमहापौर अक्षय जरग यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
schedule19 Mar 26 person by visibility 106 categoryराजकीय
कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते अक्षय विक्रम जरग यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी पेठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी खुले करण्यात आले.
या उद्घाटन समारंभावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, युवा नेते पृथ्वीराज धनंजय महाडीक, माजी उपमहापौर विक्रम जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की, "शिवाजी पेठेतील जनतेशी अक्षय जरग यांचे कौटुंबिक नाते आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील." तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी, उपमहापौर जरग यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करत या कार्यालयामुळे विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे,
नगरसेवक अजय इंगवले, प्रसाद चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवाजी पेठेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नववर्षाच्या सुरुवातीलाच लोकसेवेचे हे केंद्र सुरू झाल्याने पेठेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.