+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule24 Jul 24 person by visibility 720 categoryराज्य
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन, तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी पातळ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे संभाव्य पूर्व परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

भारतीय हवामान वेधशाळेने येणाऱ्या दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी सर्व कोल्हापूरकरांना विनंती केली आहे, की अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडावे, पर्यटन स्थळी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  कोल्हापूर जिल्ह्यात काही सकल व नदीकाठी असलेल्या भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतरित व्हावे प्रशासनाने दिलेल्या सूचनांची पालन करावे असेही आमदार पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळवले आहे. याचबरोबर पूर परिस्थितीत कोणतीही मदत हवी असल्यास तात्काळ संपर्क करावा यासाठी स्वतःचा मोबाईल नंबरसह आमदार ऋतुराज पाटील आमदार श्रीमती जयश्री जाधव आणि अजिंक्यतारा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

▪️आमदार सतेज उर्फ बंटी पाटील
9823012905
▪️आमदार ऋतुराज पाटील
9764495999
▪️आमदार श्रीमती जयश्री जाधव
9552073100
▪️अजिंक्यतारा कार्यालय
02312653288/89/90