SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय अभियंता दिन: देशउभारणीच्या शिल्पकारांचा गौरवभारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहगोकुळ निवडणुक : स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला माजी संचालकांचे अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला अभिवादनगणपती बाप्पा मोरया! राज्यभरात गणेशोत्सवाचा मंगल व उत्साही प्रारंभ; लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमनगोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजनसांगलीत महाराष्ट्र राज्य फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद; राज्यातील २५० खेळाडूंचा सहभागहुपरी येथील आरटीआय कार्यकर्त्यास गंभीर मारहाण करणारे तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईपहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कपमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी; ६ विजेते घोषितकोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांच्या एमडीसह तरुण अटकेतगणेश मंडळांना हवे सामाजिक प्रबोधनाचे भान...

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : पाणी बिल 50 टक्के सवलत योजनेमधून 2 कोटी 16 लाख वसूल

schedule21 Feb 24 person by visibility 607 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पट्टीच्या विलंब आकारामध्ये 50 टक्के सलवत योजना सुरु केली आहे. 1 ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर पाणीबिलाची थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १ ते ३१ मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. 50 टक्के विलंब आकारातील सवलतीमुळे आत्तापर्यंत रु.2 कोटी 16 लाख 11 हजार 653 वसुल झाली आहे. पाणीपट्टी विभागास 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता 77 कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार आजअखेर 38 कोटी 69 लाख 67 हजार इतकी वसुली झाली आहे.

50 टक्के सवलत योजनेअंतर्गत दिनांक 1 ते 20 फेब्रुवारी 2024 अखेर 7,516 कनेक्शनधारकांनी रु.2 कोटी 16 लाख 11 हजार 653 इतकी रक्कम भरली आहे. यामध्ये रु.14 लाख 2 हजार 202 इतक्या विलंब आकार माफ करण्यात आला आहे. यामध्ये रु.14 लाख 33 हजार 166 इतका विलंब आकार जमा झाला. तसेच 2 कोटी 1 लाख 78 हजार 487 इतकी थकीत पाणी बिलाची रक्कम जमा झाली आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मिटर रीडर यांचेशी किंवा नजीकच्या नागरी सुविधा केंद्रास संपर्क साधावा.

 तसेच गुगल-पे, फोन-पे, पेटीएम इ. मोबाईल ॲपद्वारे तसेच ऑनलाईन सुविधेद्वारे रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  तरी 50 टक्के सवलत योजनेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन महापालिकेस सहकार्य करुन नळ कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes