SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतकेआयटी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘आयडियाथॉन’ ची सांगता, ७१ इनोव्हेशन व सृजनशी कल्पनांचे तरुणाईकडून सादरीकरणसंजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहातआद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके: भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकारघोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाकेशिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमच 'माझे विद्यार्थी, माझे उद्योजक' माजी विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करारभीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांकपर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्यविश्वकर्मा पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतजीवाणू संसर्ग ओळखणारे पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल उपकरण विकसित; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे संशोधन

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : पाणी बिल 50 टक्के सवलत योजनेमधून 2 कोटी 16 लाख वसूल

schedule21 Feb 24 person by visibility 487 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पट्टीच्या विलंब आकारामध्ये 50 टक्के सलवत योजना सुरु केली आहे. 1 ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर पाणीबिलाची थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १ ते ३१ मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. 50 टक्के विलंब आकारातील सवलतीमुळे आत्तापर्यंत रु.2 कोटी 16 लाख 11 हजार 653 वसुल झाली आहे. पाणीपट्टी विभागास 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता 77 कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार आजअखेर 38 कोटी 69 लाख 67 हजार इतकी वसुली झाली आहे.

50 टक्के सवलत योजनेअंतर्गत दिनांक 1 ते 20 फेब्रुवारी 2024 अखेर 7,516 कनेक्शनधारकांनी रु.2 कोटी 16 लाख 11 हजार 653 इतकी रक्कम भरली आहे. यामध्ये रु.14 लाख 2 हजार 202 इतक्या विलंब आकार माफ करण्यात आला आहे. यामध्ये रु.14 लाख 33 हजार 166 इतका विलंब आकार जमा झाला. तसेच 2 कोटी 1 लाख 78 हजार 487 इतकी थकीत पाणी बिलाची रक्कम जमा झाली आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मिटर रीडर यांचेशी किंवा नजीकच्या नागरी सुविधा केंद्रास संपर्क साधावा.

 तसेच गुगल-पे, फोन-पे, पेटीएम इ. मोबाईल ॲपद्वारे तसेच ऑनलाईन सुविधेद्वारे रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  तरी 50 टक्के सवलत योजनेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन महापालिकेस सहकार्य करुन नळ कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes