SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात फुटपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई सुरुकोल्हापूर शहरातील भटके कुत्रे शेल्टर उभारणीसाठी महापालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेत प्राणीप्रेमींची बैठक संपन्नकोल्हापूर प्राधिकरणाला 'विशेष नियोजन प्राधिकरण' दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर; ४२ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरविधिमंडळ हिवाळी अधिवेशन-2025 'दूरध्वनी पुस्तिके'चे माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते प्रकाशन, क्यू. आर. कोडमुळे डिजिटल पुस्तिका सहज उपलब्धसतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ११ कोटींची उलाढाल, तांदळासह शेती औजारे धान्याची उच्चांकी विक्रउज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने औद्योगिक कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात निवेदनबांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधीलक्ष्मीपुरी पोलीस लाईनच्या बांधकामामुळे ड्रेनेज लाईनची दुरवस्था नेहरू हायस्कूल परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास गंभीर धोकामाती व माणसाचे आरोग्य आधुनिक तंत्रज्ञानाने दर्जेदार करणे ही काळाची गरज : डॉ. चंद्रशेखर बिरादर; राष्ट्रीय स्तरावरील ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धेचे केआयटीत दिमाखदार उद्घाटनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडांचे वृक्षारोपण"

जाहिरात

 

‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला...

schedule09 Aug 25 person by visibility 589 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्या कडून रक्षाबंधन निमित्त राखी बांधून घेण्याची परंपरा २००५ साली तत्कालीन चेअरमन विश्वास पाटील यांनी सुरु केली असून त्यांनी व सहकारी संचालकांनी गेली २० वर्ष ती जपलेली आहे. त्यानुसार आज संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील व संचालक युवराज पाटील यांना रक्षाबंधन निमित्त राजापूर ता.शिरोळ येथील श्रीमती भारती चिंचणे व बेलवले, ता.कराड येथील श्रीमती वैशाली शिंदे यांनी राखी बांधून ऋणानुबंध जपले हा कार्यक्रम गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला.

   यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमती वैशाली शिंदे यांनी गोकुळचे अशिर्वाद माझ्या सारख्‍या अनेक निराधार महिलाना लाभले आहेत. गोकुळचा ऋणानुबंध जिवनात नवीन अशा आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हे ऋण याजन्मी न फिटणारे आहे. गोकुळ परिवारास माझ्या सारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभोत व विश्वात गोकुळचे नाव उज्वल होवो अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. एड्स सारख्या असाध्य रोगाची लागण झाल्यामुळे जीवन उध्वस्त झालेल्या वैशाली शिंदे या प्रबोधनच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृतीचे काम गेली २१ वर्ष अव्याहतपणे करत आहेत. अश्या भावना श्रीमती वैशाली शिंदे रक्षाबंधन निमित्त राखी बांधताना व्यक्त केल्या .                     

   राजापूर, ता. शिरोळ येथील महिला भारती चिंचणे यांचे पती २००५ च्या महापुरात वाहून गेले. एवढेच नाही तर त्यांचे राहते घर व जनावरे देखील या पुरात वाहून गेलीत. त्यांचेवर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरण्यासाठी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी भारती चिंचणे यांना घर बांधण्यासाठी त्यावेळी गोकुळमार्फत आर्थिक सहाय्य करून त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण केली.याची जाण ठेवून भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी गेली २० वर्षे गोकुळचे व आपले ऋणानुबंध रक्षाबंधनाच्या निमित्ताने जपलेले आहेत.

     यावेळी  संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,दीपक पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes