SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागतमहिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृहकोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चितऊसतोड मजूर आणि साखर कारखाने दोघांनाही मिळणार न्याय; खा. धनंजय महाडिक यांनी सुचवला सुवर्णमध्य!‘गोकुळ’ची दमदार प्रगती ठेवी ६०४ कोटीवर ; दूध संकलन २५ लाख लिटरचे उद्दिष्ट : नामदार हसन मुश्रीफशेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजाकोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोपगॅसचा जिल्ह्यात पुरेसा साठा; नागरिकांनी आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे : पालकमंत्री१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस​"सरकारी नोकरी सोडून समाजक्रांतीचा ध्यास घेणारे: मान्यवर काशिराम!"

जाहिरात

 

केन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते अथानी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या २५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण

schedule14 Dec 25 person by visibility 811 categoryदेश

▪️बेळगावीच्या भूमीवर शौर्य, स्वाभिमान आणि अपार साहासाची अमर गाथा जिवंत झाली: सिंधिया

बेळगावी : केन्द्रीय दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज रविवारी कर्नाटकच्या बेळगावी येथील अथानी येथे मराठा शिरोमणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २५ फूट उंच भव्य पुतळ्याचे अनावरण केले. या प्रसंगाला ऐतिहासिक ठरवत सिंधिया म्हणाले की, हे केवळ एका पुतळ्याचे अनावरण नाही, तर भारताचा स्वाभिमान, साहस आणि हिंदवी स्वराज्याची चेतना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे. ते म्हणाले की, "जय भवानी, जय शिवाजी" चा उद्घोष आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्भीडता, राष्ट्रधर्म आणि आत्मगौरवाची ऊर्जा भरतो. या कार्यक्रमादरम्यान मंजुनाथ भारती स्वामीजी, संभाजी भिडे गुरुजी, कर्नाटक सरकारमधील मंत्री संतोष लाड आणि सतीश जारकीहोळी, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री श्रीमंत बी. पाटील आणि पीजीआर शिंदे यांच्यासह इतर नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार आणि राष्ट्रधर्माचे प्रतीक आहेत शिवाजी महाराज
आपल्या भाषणात केन्द्रीय मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि संघर्ष आठवून सांगितले की, वयाच्या केवळ १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचा संकल्प करणाऱ्या शिवाजी महाराजांनी साहस, नीती आणि दूरदृष्टीने परकीय आक्रमणकर्त्यांना  पराभूत करून भारताच्या स्वाभिमानाचे रक्षण केले. सिंधिया म्हणाले की, बेळगावी आणि अथानीची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षीदार राहिली आहे. दक्षिण भारतातील त्यांच्या मोहिमे दरम्यान या क्षेत्राचे सामरिक महत्त्व मोठे होते, जिथून दख्खन, कोकण आणि गोवा मार्गांची सुरक्षा सुनिश्चित केली गेली. ते म्हणाले की, आज याच भूमीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणे हा इतिहास, परंपरा आणि वर्तमान यांना जोडणारा गौरवपूर्ण क्षण आहे. सिंधिया म्हणाले की, आज बेळगावीच्या भूमीवर शौर्य, स्वाभिमान आणि अपार साहासाची अमर गाथा जिवंत झाली आहे.

शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आधुनिक भारत वाटचाल करत आहे: सिंधिया
केन्द्रीय मंत्री म्हणाले की, आज जेव्हा भारत आत्मगौरव आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या मार्गावर पुढे जात आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अधिक प्रासंगिक झाले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रधर्माची जी चेतना देशात वाढत आहे, तिचे मूळ हे शिवाजी महाराजांच्या त्याच विचारधारेत आहेत. हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना हा संदेश देत राहील की राष्ट्रहित सर्वोपरी आहे, साहस कधी थांबत नाही आणि स्वराज्याची भावना कधी जुनी होत नाही.
विशेष म्हणजे, केन्द्रीय मंत्री त्यांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र-कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यापूर्वी शनिवारी त्यांनी कोल्हापूरमध्ये बॉम्बे जिमखान्याच्या १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे विमोचन केले, त्यानंतर ते ग्रामीण डाक संमेलनात सहभागी झाले, जिथे त्यांनी ग्रामीण डाक सेवकांशी संवाद साधला. त्यानंतर आज सिंधिया बेळगावीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपस्थित राहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes