![](_SMPNews/u/pos/202402/1000297928--800.jpg)
कोल्हापूर : योग व निसर्गोपचार ही विनाऔषधी व भारताची समृध्द उपचार पध्दती आहे. या पध्दतीचा म्हणावा तितका प्रसार देशात झाला नाही. न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया देशामध्ये अनेक निसर्गोपचार केंद्र सुरु झाली असून भारतात अद्यापही ही उपचार पध्दती बालअवस्थेत आहे. म्हणूनच या क्षेत्रातील नवे आयाम जगासमोर येणे आवश्यक, असे मत आचार्य, मर्मयोगी हेमंत खेडेकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय योग व निसर्गोपचार परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.
मानव्यशास्त्र विभागाच्या सभागृहात संपन्न होत असलेल्या दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेसाठी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद बनसोडे हे होते.
21 व 22 फेब्रुवारी रोजी संपन्न होत असलेल्या या परिषदेत निसर्गोपचार, योग, स्पोर्टस मसाज, प्राणिक हिलर, उद्योजकता विकास अशा अनेक विषयावर देश-विदेशातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान उद्धाटन समारंभात आचार्य हेमंत खेडेकर यांनी मर्मचिकीत्सा या नव्या आयामाची सविस्तर माहिती दिली. डॉ. शरद बनसोडे यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या.
उद्धाटन समारंभाचे स्वागत विभागप्रमुख डॉ. आर. जी. पवार (संचालक) यांनी केले. पाहुण्याचा परिचय श्री. कानिफनाथ पंढरे (सहाय्यक प्राध्यापक एम. ए. योगशास्त्र) यांनी करुन दिली. यशोधन बोकील यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र जाधव, अरविंद पालके, उदय घाटे, यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. आर. गुरव यांनी केले. या परिषदेला योग व निसर्गोपचाराचे विद्यार्थी, अभ्यासक, तज्ञ मार्गदर्शक मोठया संख्येने उपस्थित होते.