+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Jul 24 person by visibility 385 categoryगुन्हे
मुंबई : जालना राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एका काळी पिवळी जीप विहिरीत पडून ७ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मतदीने बाहेर काढण्यात आले आहेत. वारकरी पंढरपूर वरून घरी जात असताना ही दुर्घटना घडली आहे. सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे .

अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले त्यामुळे ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.