+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule27 Jul 24 person by visibility 376 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : काळम्मावाडी येथे वीज वाहिनीचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्यात असून दुपार पर्यंत हे काम पुर्ण होवून काळम्मावाडी योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्याचे काम कोल्हापूर महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेतील २० कि.मी. लांबीचे वीज वाहिनी तपासणीचे काम काल सायंकाळी पुर्ण झाले असून ७ कि.मी. लांबीचे वीज वाहिनी तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. हे काम दुपारपर्यंत पुर्ण करुन शहराला काळम्मावाडी योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे नियोजन सुरु आहे.

 तसेच सध्या बालिंगा उपसा केंद्रातील ३०० एच.पी. पंपसेट सुरू असून यामधून शहराला पाणी उपसा सुरू आहे. सदरचा पाणी पुरवठा हा सी, डी वॉर्ड व संलग्नीत फुलेवाडी रिंगरोड या भागात करण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिकेचे ४ व २६ टँकर भाडयाने महापालिकेने घेतले असून १५ टँकर बावडा फिल्टर हाऊस येथे व १५ टँकर कळंबा फिल्टर हाऊस येथे तयार ठेवण्यात आले आहे. या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक अधिकारी,कर्मचारी व चावीवाले यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

 तरी शहरातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे व नळाद्वारे येणार पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.