+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule08 Jul 24 person by visibility 457 categoryगुन्हे
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वडणगे येथे शेतात पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन विक्रम साखळकर (वय ३३)या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील वडणगे येथील साखळकर मळ्यात राहणारा विक्रम आज सायंकाळी गवताला लागवड टाकण्यासाठी शेतात गेला होता. त्याचवेळी शेतात तुटून पडलेली महावितरणची विद्युत तार विक्रमला न दिसल्याने या तारेला स्पर्श झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. 

विक्रमचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला पाच वर्षाची एक मुलगी असून चार दिवसांपूर्वीच त्याला दुसरी  मुलगी झाली आहे. विक्रमच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 गेल्या आठवड्यामध्ये कोपार्डे येथील दोघा सख्या भावाचा विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज हा प्रकार घडला आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाताना खबरदारी घेण्याची गरज आहे.