कळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहण
schedule01 May 26 person by visibility 115 categoryसामाजिक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील कळंबा तर्फ ठाणे ग्रामपंचायत येथे आज, शुक्रवारी अत्यंत उत्साही आणि मांगल्याच्या वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ग्रामपंचायत इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले.
या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने झाली. सुरुवातीला लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत क्लार्क प्रकाश रघुनाथ खडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून भारतमाता आणि महाराष्ट्राचा जयजयकार केला.
या दिमाखदार सोहळ्याला लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये उपसरपंच रोहित मिरजे, सदस्य विकास पवार, दीपक तिवले, संदीप पाटील, रोहित जगताप, स्वरुप पाटील, उदय जाधव, सोनल शिंदे, पुनम जाधव, दिपाली रोपळकर, मीना गोंड, वैशाली टिपूगडे, आशा टिपूगडे, स्नेहल जाधव, भाग्यश्री पाटोळे, संगीता माने, छाया भवड आणि माजी सरपंच विश्वास गुरव यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
प्रशासकीय स्तरावरून ग्रामपंचायत अधिकारी व्ही. डी. राबाडे, महसूल तलाठी सचिन पाटील, भूमी अधिकारी दीपक कोरडे, कृषी अधिकारी नामदेव गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच लक्ष्मण मिरजे, महादेव तिवले, विशाल सोनुले, अमोल पाटील, निवृत्ती चौगुले, राहुल मिरजे, प्रथमेश तिवले, अनिल अवघडे, बजरंग टिपूगडे, सुरेश लोहार, अमर मांगलेकर, वसंत तिवले, प्रवीण जाधव, जयश्री तिवले, राजू गोंड, अतुल अवघडे, दिलीप साठे, महेश अवघडे, विद्या माने, गीता माने, विमल तडाखे आणि शांताबाई सोनुले यांसह कळंबा गर्ल हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.