+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule02 Jul 24 person by visibility 253 categoryगुन्हे
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण चेंगराचेगरीत120 भाविक ठार झाले. मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा अधिक समावेश आहे.

कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर भाविक बाहेर पडाला लागले तेव्हा चेंगराचेंगरी झाली, महिला आणि मुले पायदळी तुडविली गेली. संपूर्ण परिसरात केवल लोकांच्या किंकरख्ख्या आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. सरकारी रुग्णालयाबाहेर भयावह परिस्थिती होती.रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच पडला होता.

 हाथरसपासून ४७ किमी अंतरावर सिकंदराराऊ जवळच्या फुलरई गावात नारायण साकार हरी ऊर्फभोले बाबांचा सत्संग आयोजित केला होता. त्यास हजारो भाविक उपस्थित होते. सत्संग झाल्यानंतर भोले बाबांच्या पायाखालील माती घेण्यासाठी भाविकांचे धावले आणि काही भाविक पाडले आणि ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रम मोकळ्या जागेत होता. पावसामुळे चिखल होता. बाहेर पडण्यासाठी लोक धावले यावेळी काही घसरून पडले व चेंगराचेंगरी झाल्याचेही सांगण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. पीडितांची सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. घटनेसाठी कोणीही दोषी असो, सोडणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.