+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule19 Oct 24 person by visibility 188 categoryशैक्षणिक
कोल्हापूरः भाषेच्या संशोधकांनी पुस्तकांतील सत्य आणि तथ्यांची पारख करत असताना वास्तवाचे भान ठेवावे. समाजातील चुकीच्या घटनांवर भाष्य करण्याचे ज्ञान अवगत करावे. यासाठी समाज जाणिवा ही टोकदार ठेवाव्यात. असे आवाहन हैद्रराबाद विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. माया पंडित-नारकर यांनी केले.

पीएम-उषा योजनेंतर्गत शिवाजी विद्यापीठातील वि.स. खांडेकर भाषा भवन येथे संशोधन पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवारी पार पडली. या कार्यशाळेत डॉ. पंडित या उद्घाटक व प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. त्यांनी पीपीडीद्वारे चार कविता व कथांविषयी संशोधन दृष्टी विकसित करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अध्यक्षस्थानी संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. के. के. शर्मा होते. प्रास्ताविक व स्वागत कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केली. मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी संशोधकांकडून होत असलेल्या सामान्य चुकांविषयी माहिती दिली. आभार डॉ. ए. एम. सरवदे यांनी व्यक्त केले.

दूस-या सत्रात पुणे विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. प्रभाकर देसाई यांनी नवउदारवाद विषयी भाष्य करीत समाजातील बदलांना अधोरेखित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तिस-या सत्रात हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एस. सावंत यांनी संशोधकांनी वाचनातून वैचारिक प्रगल्भता वाढविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. गीता दोडमणी यांनी केले. तिन्हीं पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रकाश मुंज, डॉ. सुखदेव एकल व मृणाल मोहिते यांनी करून दिला. आभार प्रकाश निकम यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने व विदेशी भाषा विभाग प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. सी. ए. लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. एम. एस. वासवाणी, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. दीपक भादले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. सुरेंद्र उपरे यांच्यासह मराठी, हिंदी, इंग्रजी व विदेशी भाषांचे संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.