+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule18 Oct 24 person by visibility 211 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये अन्न तंत्रज्ञान विभाग, AFST(I) कोल्हापूर चॅप्टर, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाच्या IISC आणि SCII यांच्या संयुक्त माध्यमाने जागतिक अन्न दिवस साजरा केला गेला. संपूर्ण जगभरात अन्नधान्याची नासाडी कमी करून, पोषक व पुरेसा आहार या पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवास मिळावी या उद्देशाने त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक अन्न दिवस हा दरवर्षी १६ ऑक्टोबर केला जातो.

 यावर्षी जागतिक अन्न दिवस हा "चांगल्या आयुष्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी अन्नाचा अधिकार" या विषयावर साजरा करण्याचे ठरवले आहे. या कार्याक्रमानिमित्त तंत्रज्ञान अधिविभागामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर स्पर्धा, फूड मॉडेल, फूड प्रोडकट डेव्हलपमेंट, प्रश्नमंजुषा व वादविवाद स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्याचे विशेष कौतुक व मार्गदर्शन केले.

मुख्य अतिथी डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि डॉ. शर्मिली माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, प्युअर मी ओर्गानिक्स, कोल्हापूर), डॉ. इराण्णा उडचाण (समन्वयक, अन्न तंत्रज्ञान शाखा, तंत्रज्ञान अधिविभाग) डॉ. जी. एस. कुलकर्णी (प्रोफेसर, स्थापत्य अधिविभाग), डॉ. एस. एम. गायकवाड (प्रशासकीय अधिकारी, तंत्रज्ञान अधिविभाग), यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. व्ही. एन. शिंदे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व भावी अन्न वैज्ञनिकाना शाश्वत विकास कसा साधता येईल याचे मनन व चिंतन करण्यास उत्स्फूर्त केले. 


डॉ. शर्मिली माने यांनी गुळप्रक्रियाउद्योगातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यामध्ये गूळप्रक्रिया उद्योगातील आव्हाने, त्यांची जास्त वेळ कशी साठवण करता येईल व शाश्वत विकास कसा साधता येईल याबद्दल त्यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. अन्न तंत्रज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. इराण्णा उडचाण यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश व रूपरेषा सांगितले. कार्यक्रमाची सांगता विजेत्यांना डॉ.जी. एस. कुलकर्णी (प्रोफेसर, स्थापत्य अधिविभाग), यांच्या हस्ते बक्षीसे देऊन करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी शिक्षक व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले