SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासननैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार; आमदार सतेज पाटील यांचा सवाल गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी : उपमुख्यमंत्री अजित पवारपन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैलाकोल्हापूर : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंदआर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्केअंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचे ५ जुलै रोजी प्रकाशन; डॉ. अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यानडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट 'एक्सलंट' श्रेणीत; उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेवर मोहर

जाहिरात

 

आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

schedule02 Jul 25 person by visibility 187 categoryशैक्षणिक

 कोल्हापूर : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त आणि आर्थिक पारदर्शकता महत्त्वाची असते. आर्थिक साक्षरतेच्या मोहिमेत अर्थतज्ज्ञ, लेखकांची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः अलीकडच्या काळात वाढत असलेली आर्थिक फसवणूक विचारात घेता नागरिकांचे आर्थिक प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी व्यक्त केले.

मराठी विश्व कोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य प्रा.संजय ठिगळे यांनी कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य व प्रख्यात लेखक-समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांना ‘अर्थतरंग’ हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. 

प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील म्हणाले, अर्थसाक्षरतेशिवाय विकास शक्य नाही. विशेषतः तरुणाईने त्यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे.

डॉ.रणधीर शिंदे म्हणाले, प्रा. ठिगळे यांच्या अर्थतरंग पुस्तकाच्या माध्यमातून अर्थसाक्षरतेला निश्चितपणे चालना मिळेल.
यावेळी प्रा. ठिगळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा समन्वयक म्हणून काम करीत असताना समाजाशी नाळ जोडली गेली. त्या अनुभवाचा फायदा लेखन करण्यासाठी झाला. कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी प्रा. ठिगळे यांच्या समाज जागृतीपर लेखन उपक्रमाचे कौतुक केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes