SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पूर्वापार गाडीवाट रस्त्याचा वाद सामंजस्याने निकाली काढण्याचे प्रयत्न : तहसीलदार ऋषिकेत शेळके डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवडसंजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET - २०२५ मध्ये चमकदार कामगिरीबबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : माजी आमदार जयश्री जाधव यांची भावनाप्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासननैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार; आमदार सतेज पाटील यांचा सवाल गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी : उपमुख्यमंत्री अजित पवारपन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैलाकोल्हापूर : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंदआर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

जाहिरात

 

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार; आमदार सतेज पाटील यांचा सवाल

schedule03 Jul 25 person by visibility 205 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूमूखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे. असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी अधिवेशनात उपस्थित केला. यावर, शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत मदत देण्यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरु असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. 

 सतेज पाटील म्हणाले, राज्यात गेल्या तीन महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे तसेच वीज पडून झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर जिवितहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पाहणी आणि पंचनामे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुुटुंबियांंना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली ? असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

यावर मंत्री मकरंद पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मृत व्यक्ती आणि मृत जनावरांबाबत अनुदान तातडीने आणि वेळेवर वाटपासाठी उणे प्राधिकार पत्रावर देयक सादर करण्याची सुविधा शासनाकडून देण्यात आल्याचे सांगितले. काही ठिकाणी अनुदान वाटपही केले आहे. तर काही ठिकाणी अनुदान वाटपाबाबतची कार्यवाही तहसीलस्तरावर सुरु आहे. शेती पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन मदत वितरणाबाबत सूचना दिल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes