SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जेव्हा पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा ...२ मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणारविशेष संख्याशास्त्रीय सादरीकरणात कवठेमहांकाळचे महाविद्यालय प्रथममुंबईचे महापौर, उपमहापौर, पदाधिकारी सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटनसाहित्य, समाज, वास्तवाशी जोडलेले चित्रपट हे प्रभावी माध्यम : डॉ. डेल्फिम द सिल्वा; शिवाजी विद्यापीठात ल्युसोफोन चित्रपट महोत्सवाचे उद्घाटनभाजपा जिल्हा कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादनएस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजननोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्माते बना : सुरेश उमाप; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

जाहिरात

 

इचलकरंजीत युवकाचा निघृण खून; दोघांना अटक

schedule31 Mar 24 person by visibility 516 categoryगुन्हे

कोल्हापूर : गाडीचे हप्ते भरण्यावरुन झालेल्या वादातून रोहित बाळू तडाखे (वय २५ रा. साईट नं.१०२) याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन गळा चिरुन खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. साईट नं. १०२ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ही घटना घडली. या प्रकरणी मृताची आई श्रीमती राधा तडाखे यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून नाथा उर्फ शंकर  हा फरारी आहे.

 मुळचा जाधव मळा परिसरात राहणारा रोहित तडाखे हा काही महिन्यांपासून साईट नं. १०२ मधील रमाई आवास घरकुल योजनेतील घरात घुसखोरी करुन रहात होता. याच परिसरातील राहुल पाथरवट याच्याशी रोहित याचा सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता. राहुल पाथरवट याने रोहित तडाखे याच्या नावे कर्जप्रकरण करुन दुचाकी घेतली होती. परंतू त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने त्याच्या वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते. सततच्या या तगाद्याला रोहित त्रासला होता. यासंदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस अशी विचारणा केली. त्यावरुन रोहित व राहुल यांच्यात भांडण झाले होते. त्यातूनच राहुल व संदेश पाथरवट आणि शंकर या तिघांनी रोहित याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 पूर्वीच्या भांडणाच्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला. त्या वादातच राहुल, संदेश व शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहित याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये रोहित याचा जागीच मृत्यू झाला. 

रोहित याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवट, संदेश पाथरवट व शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

यातील संशयित राहुल पाथरवट हा पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार आहे. या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत राहुल आणि संदेश या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित फरारी शंकर जावीर आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक प्रविण खानापूरे करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes