SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजीअजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट" कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या क्रीडापटूंचा भव्य सन्मान सोहळा संपन्नचिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."

जाहिरात

 

इचलकरंजीत युवकाचा निघृण खून; दोघांना अटक

schedule31 Mar 24 person by visibility 548 categoryगुन्हे

कोल्हापूर : गाडीचे हप्ते भरण्यावरुन झालेल्या वादातून रोहित बाळू तडाखे (वय २५ रा. साईट नं.१०२) याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन गळा चिरुन खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. साईट नं. १०२ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ही घटना घडली. या प्रकरणी मृताची आई श्रीमती राधा तडाखे यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून नाथा उर्फ शंकर  हा फरारी आहे.

 मुळचा जाधव मळा परिसरात राहणारा रोहित तडाखे हा काही महिन्यांपासून साईट नं. १०२ मधील रमाई आवास घरकुल योजनेतील घरात घुसखोरी करुन रहात होता. याच परिसरातील राहुल पाथरवट याच्याशी रोहित याचा सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता. राहुल पाथरवट याने रोहित तडाखे याच्या नावे कर्जप्रकरण करुन दुचाकी घेतली होती. परंतू त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने त्याच्या वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते. सततच्या या तगाद्याला रोहित त्रासला होता. यासंदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस अशी विचारणा केली. त्यावरुन रोहित व राहुल यांच्यात भांडण झाले होते. त्यातूनच राहुल व संदेश पाथरवट आणि शंकर या तिघांनी रोहित याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 पूर्वीच्या भांडणाच्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला. त्या वादातच राहुल, संदेश व शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहित याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये रोहित याचा जागीच मृत्यू झाला. 

रोहित याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवट, संदेश पाथरवट व शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

यातील संशयित राहुल पाथरवट हा पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार आहे. या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत राहुल आणि संदेश या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित फरारी शंकर जावीर आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक प्रविण खानापूरे करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes