SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दक्षिण महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी लोकप्रतिनिधींची बैठक घेणारदूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद : डॉ.अभिनव गौरवमुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरे, चाळींचा झपाट्याने विकास होणारराज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम; आयुष्मान भारत–महात्मा फुले योजनेंतर्गत मोठ्या सुधारणा लागूलाडकी बहिण योजनेचे मानधन १५०० रुपया वरून २१०० रुपये करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली : सतेज पाटील यांचा विधिमंडळ अधिवेशनात सवाल कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करारमहाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंय : सतेज पाटील यांचा सवाल विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाईन.पा. मतमोजणी 21 डिसेंबरला; जिल्हाधिकाऱ्यांकडून 200 मीटर परिसरात निर्बंध लागूदुचाकी वाहनांची नोंदणी मालिका 17 डिसेंबरपासून

जाहिरात

 

इचलकरंजीत युवकाचा निघृण खून; दोघांना अटक

schedule31 Mar 24 person by visibility 447 categoryगुन्हे

कोल्हापूर : गाडीचे हप्ते भरण्यावरुन झालेल्या वादातून रोहित बाळू तडाखे (वय २५ रा. साईट नं.१०२) याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन गळा चिरुन खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. साईट नं. १०२ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ही घटना घडली. या प्रकरणी मृताची आई श्रीमती राधा तडाखे यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून नाथा उर्फ शंकर  हा फरारी आहे.

 मुळचा जाधव मळा परिसरात राहणारा रोहित तडाखे हा काही महिन्यांपासून साईट नं. १०२ मधील रमाई आवास घरकुल योजनेतील घरात घुसखोरी करुन रहात होता. याच परिसरातील राहुल पाथरवट याच्याशी रोहित याचा सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता. राहुल पाथरवट याने रोहित तडाखे याच्या नावे कर्जप्रकरण करुन दुचाकी घेतली होती. परंतू त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने त्याच्या वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते. सततच्या या तगाद्याला रोहित त्रासला होता. यासंदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस अशी विचारणा केली. त्यावरुन रोहित व राहुल यांच्यात भांडण झाले होते. त्यातूनच राहुल व संदेश पाथरवट आणि शंकर या तिघांनी रोहित याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 पूर्वीच्या भांडणाच्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला. त्या वादातच राहुल, संदेश व शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहित याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये रोहित याचा जागीच मृत्यू झाला. 

रोहित याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवट, संदेश पाथरवट व शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

यातील संशयित राहुल पाथरवट हा पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार आहे. या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत राहुल आणि संदेश या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित फरारी शंकर जावीर आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक प्रविण खानापूरे करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes