SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरची हद्दवाढ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : आमदार राजेश क्षीरसागरनळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्या : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरपरमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो : मंत्री हसन मुश्रीफ युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेटकळंबा : ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १८ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभइंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा दणका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज मोठी वाढ‘केआयटी’ च्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांची एकजूट; दिल्लीत ‘अल्युमिनी मीट २०२६’ चा दैदीप्यमान सोहळा उत्साहात जागतिक कुटुंब दिन: नात्यांचा ओलावा आणि समृद्धीचा पायामहाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणारअल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश

जाहिरात

 

परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो : मंत्री हसन मुश्रीफ

schedule15 May 26 person by visibility 123 category

◼️वंदूरमध्ये श्री  विठ्ठल- रुक्माई मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात
        
वंदूर : परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो अन्यथा तो हैवान बनला असता, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या भावनेतूनच माझ्या हातून साडेनऊशेहून अधिक मंदिराचा जिर्णोद्धार व बांधकामे झाली, असेही ते म्हणाले.
          
वंदूर ता. कागल येथे श्री. विठ्ठल- रुक्माई मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला. 
              
मंत्री  मुश्रीफ म्हणाले, या मंदिरांच्या वास्तुशांती सोहळ्यानिमित्त संपूर्ण गाव एक झाला ही मनाला आनंद देणारी बाब आहे. गेल्या 35- 40 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मला अनेक चांगली कामे करता आली. त्यापैकीच अत्यंत समाधानकारक काम म्हणजे साडेनऊशेहुन अधिक मंदिराची उभारणी आणि जिर्णोद्धार केले. 
        
श्री. मुश्रीफ म्हणाले, देवाबद्दल वेगवेगळे विचार आणि मतप्रवाह आहेत. आस्तिक- नास्तिक असे लोकांचे प्रकार आहेत. परंतु; एक शक्ती हे जग चालवते यावर माझा गाढ विश्वास आहे. मानवाचा जन्म होतो, मृत्यू होतो व  त्याच्या जीवनात बऱ्यावाईट घटना घडतात. यापैकी काहीच आपल्या हातात नसते. हे सगळं घडविणारी एक शक्ती आहे, त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो. या परमेश्वरावर जर मानव जातीची श्रद्धा नसती तर मानव हैवान बनला असता. देवालयांचे यश मी यामध्ये बघतो की, मंदिरांमधून माणसं भजन करत आहेत, कीर्तन करत आहेत. त्यामुळेच समाजात सदाचार आणि सलोखाही वाढत आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने कोट्यावधी लोक श्री. विठ्ठल- रुक्मिणीच्या ध्यासाने पायी चालत असतात. जगामधील ही अशी एकच गोष्ट आहे की, जिला मॅनेजमेंट नाही. भक्तीच्या निर्मळ भावनेतूनच ही वारी सुव्यवस्थित पार पडत असते.
      
◼️अलौकिक मंदिर...! 
मुश्रीफ म्हणाले, वंदुरकर ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर आखीव-रेखीव मंदिर साकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती- धर्मांच्या मावळ्यांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातली. रयतेची राज्य कसे असावे आणि जनतेसाठी कसे जगावे, याचा आदर्श वस्तू पाठ घालून दिला. या मंदिरासाठी आवश्यक असलेला आणखी निधीही देऊ.
         
जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती व गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अमरीशसिंह घाटगे म्हणाले, वंदुरकर ग्रामस्थांनी विठ्ठल- रुक्मिणी मंदिराबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर साकारले. या मंदिरांच्या उभारणीतून व या सोहळ्यातून वंदूर गावाने गावाचा एकोपा कसा असतो, हे दाखवून दिलेले आहे. नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात नऊशेहून अधिक मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले आहे.
        
यावेळी व्यासपीठावर गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, शिवसिंह घाटगे,  कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. दिपाली घाटगे, वंदूरच्या सरपंच सौ. धनश्रीदेवी घाटगे, उपस्थित होते.
        
स्वागत व प्रास्ताविक कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञा कांबळे यांनी केले. आभार उत्तम कांबळे यांनी मानले.स्तुशांती सोहळ्याला मंत्री हसन मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, शिवसेना घाटगे, धनश्रीदेवी घाटगे, धनराज घाटगे आदी प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes