SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणज्येष्ठांसाठी ग्रामपंचायतींमध्येही विरंगुळा केंद्रांची होणार निर्मितीकोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी होणार स्वतंत्र समुपदेशन केंद्र; जिल्हास्तरीय बैठकीत धोरण अंमलबजावणीवर चर्चाअनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनाग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर'पीएसआय' पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू; राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला यशनमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणारसंजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढनॅशनल आयडियल टीचर अवॉर्डचे ७ सप्टेंबरला वितरणस्मृतीशेष डी. जी. राजहंस, डॉ. वसंत भागवत यांना जीवनगौरव जाहीरध्वनीक्षेपक वापराबाबत गणपती व ईद-ए-मिलादसाठी सुट जाहीर

जाहिरात

 

सिद्धार्थनगरातील दंगल : दोन्ही गटांतील ४०० जणांवर गुन्हा; बंदोबस्त कायम

schedule24 Aug 25 person by visibility 204 categoryगुन्हे

कोल्हापूर : सिद्धार्थनगर कमानीजवळ भारत तरुण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेले फलक आणि साउंड सिस्टमच्या वादातून झालेल्या दगडफेकप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. यातील ३१ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.  दरम्यान, दोन्ही गटांनी समजुतीची भूमिका घेतल्याने शनिवारी (दि. २३) तणाव निवळला. दगडफेकीत सात वाहनांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. परिसरात पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे.

शुक्रवारी दोन गटांतील वादाचे पर्यवसान दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, शस्त्रे नाचवून दहशत माजवणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत. 

दरम्यान अधीक्षक कार्यालयातील बैठकीत पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दोन्ही गटांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. बैठकीत दोन्ही गटांतील नेत्यांनी सलोखा कायम राखण्याचे आश्वासन दिले. आरपीआयचे उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, विकी कांबळे, रजनिकांत सरनाईक, स्वप्निल पन्हाळकर, जय पटकारे, डॉ. शशिकांत खोडशे, स्वाती काळे, सीमा कांबळे. माजी नगरसेवक आदिल फरास, रियाज सुभेदार, नंदकुमार मोरे, कादर मलबारी, जाफर बाबा, शकील नगरजी, इसाक पठाण, मुस्ताक मलबारी यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes