SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात एमएसएमई व स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शक संवाद सत्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर शहरात स्वच्छता मोहीमसहा दिवसीय कार्यशाळेचा समारोप समारंभडीकेटीईचे प्रा. आरती भोकरे यांना पी.एच.डी. प्रदानकोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी गैर हजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस"दुर्गम,आदिवासी, ग्रामीण आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशनाद्वारे, पारदर्शक पद्धतीने पदोन्नती करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय"टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, शुभमन गिल बाहेर, इशान किशनची एन्ट्रीरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा स्मशानभूमीस एक लाख शेणीदान संकल्पकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग १८ मधून युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव निवडणूक रिंगणात....यशवंत विद्यालयमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

जाहिरात

 

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट

schedule19 Sep 24 person by visibility 575 categoryआरोग्य

कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानातर्गत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून 72 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले. 

आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना किमान सहा महिन्यासाठी पोषण आहार किट देऊन 'निक्षय मित्र' बनण्याचे आवाहन करण्यात आले होते.  

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर व करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांच्याकडून केलेल्या आवाहनानुसार डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून आमदार श्री ऋतुराज पाटील यांनी 72 क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट उपलब्ध करून दिले आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते व आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित क्षयरुग्णांना हे कीट प्रदान करण्यात आले.

 टी.बी च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर सकारात्मक परिणाम दिसत नाही. पूर्ण औषधोपचारामुळे व योग्य पोषण आहार यामुळे टी.बी. पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यानी दिली.

यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज पटेल, करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने श्रीम. दिया कोरे,  धनंजय परीट, डी. डी. पाटील, श्री. एकनाथ पाटील, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes