SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभमुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याकडून शहरातील मतदान केंद्रांची पाहणीजिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका मतदारांना आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी ‘टेकस्प्रिंट : डायमेन्शन एक्स’ हॅकेथॉनचे आयोजनकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : आज मतदान, उद्या समजणार करेक्ट कार्यक्रमबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापरकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक विभागातील 2 हजार 975 अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवानासंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा केएलई युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरूआयआयएम बेंगलोर–तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय चर्चासत्र

जाहिरात

 

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट

schedule19 Sep 24 person by visibility 597 categoryआरोग्य

कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानातर्गत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून 72 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले. 

आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना किमान सहा महिन्यासाठी पोषण आहार किट देऊन 'निक्षय मित्र' बनण्याचे आवाहन करण्यात आले होते.  

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर व करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांच्याकडून केलेल्या आवाहनानुसार डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून आमदार श्री ऋतुराज पाटील यांनी 72 क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट उपलब्ध करून दिले आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते व आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित क्षयरुग्णांना हे कीट प्रदान करण्यात आले.

 टी.बी च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर सकारात्मक परिणाम दिसत नाही. पूर्ण औषधोपचारामुळे व योग्य पोषण आहार यामुळे टी.बी. पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यानी दिली.

यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज पटेल, करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने श्रीम. दिया कोरे,  धनंजय परीट, डी. डी. पाटील, श्री. एकनाथ पाटील, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes