SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक लोकसंख्या दिन: प्रगती आणि आव्हानांचा समतोल साधण्याची संधी!शिरोळ तालुक्यात विविध शासकीय योजनांचा आढावासरकारला आरसा दाखवणे म्हणजे 'महाराष्ट्रद्रोह' नव्हे; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघाती हल्ला!योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री : ‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन; डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन कसबा बावडा पंप हाऊस येथील दुरुस्ती मुळे ई वॉर्डचा १३ जुलैला पाणीपुरवठा बंदशहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर रूपाराणी निकमराजूर ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन सुधारित प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड; सर्वोच्च पॅकेज ₹२७.५० लाखकोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठा

जाहिरात

 

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट

schedule19 Sep 24 person by visibility 671 categoryआरोग्य

कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानातर्गत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून 72 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले. 

आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना किमान सहा महिन्यासाठी पोषण आहार किट देऊन 'निक्षय मित्र' बनण्याचे आवाहन करण्यात आले होते.  

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर व करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांच्याकडून केलेल्या आवाहनानुसार डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून आमदार श्री ऋतुराज पाटील यांनी 72 क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट उपलब्ध करून दिले आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते व आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित क्षयरुग्णांना हे कीट प्रदान करण्यात आले.

 टी.बी च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर सकारात्मक परिणाम दिसत नाही. पूर्ण औषधोपचारामुळे व योग्य पोषण आहार यामुळे टी.बी. पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यानी दिली.

यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज पटेल, करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने श्रीम. दिया कोरे,  धनंजय परीट, डी. डी. पाटील, श्री. एकनाथ पाटील, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes