SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत 'शाहिरी बाणा' कार्यक्रमओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ सिरत मोहल्ला परिसरामध्ये प्रचार फेरीमहायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा जयघोष, शेकडो समर्थकांच्या सहभागाने सत्यजित जाधव यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फेरी, खासदार धनंजय महाडिक यांचा सहभागगजेंद्र प्रतिष्ठानकडून विद्यापीठास आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ देणगीडिजिटल युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ई-कन्टेन्ट अपरिहार्य ; अभिजित रेडेकरवंचितांच्या जगण्याचा इतिहास सामोरा यावा ; प्रा. ज्ञानेंद्र पांडेयसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”प्रभाग क्रमांक 11 मधील सत्यजीत जाधव यांच्या प्रचारार्थ सिद्धाळा, टिंबर मार्केट परिसरात प्रचार फेरीसन्मान योजनेसह शासन दरबारी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार ; आमदार सतेज पाटील यांची ग्वाही भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून आजमावली मते

जाहिरात

 

विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

schedule19 Jul 24 person by visibility 510 categoryराज्य

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये याची कोल्हापूर जिल्हा व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच विशाळगड घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण करावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिल्या.

विशाळगड येथील घटना व सद्यपरिस्थितीबाबत मंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्याकडून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतून माहिती घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस प्रधान सचिव रिचा बागला, वक्फ बोर्डाचे मुख्य अधिकारी श्री. जुनेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

  मंत्री श्री. सत्तार यांनी सुरवातीस विशाळगड घटनेमुळे मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी मध्ये झालेल्या घरांच्या व प्रार्थनास्थळाच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी सांगितले की, बाधित झालेल्या कुटुंबास तातडीची मदत म्हणून 25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये मदत केलेली आहे. आणखी मदतीसाठी 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. पंडित यांनी पोलीस विभागामार्फत दोषींवर करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली.

 मंत्री सत्तार यांनी सांगितले की, विशाळगड घटनेमुळे वातावरण दूषित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. समाजकंटकांवर पोलीस विभागाने तातडीने कारवाई करावी. याठिकाणी असलेली घरे, व्यावसायिक दुकाने, प्रार्थना स्थळांच्या नोंदी तपासाव्यात. विशाळगड येथील अतिक्रमणे काढताना लोकांना विश्वासात घेऊन काढावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes