SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णयचैत्र यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको, सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदुधगंगा डावा कालवा गेट दुरुस्तीबाबत खुलासाशास्त्रीय गायकीतील सौंदर्य आणि संशोधन पद्धतीवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा संपन्नदिव्यांग सुलभता मानकांबाबत विद्यापीठात २३ ला कार्यशाळाडॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!

जाहिरात

 

‘गुलजार ए रजा’ संस्थेची एटीएसमार्फत चौकशी सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule18 Mar 26 person by visibility 92 categoryराज्य

मुंबई  : गुलजार ए रजा या संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर बाबी समोर आल्याने या प्रकरणाची एटीएसमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची मर्यादा केवळ धार्मिक कारणासाठी निधी जमा करण्यात आला एवढ्यावरच नसून तपासादरम्यान परदेशातील संस्थेकडून सुमारे २५ लाखांची रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेची सर्व बँक खाती सील करण्यात आली असून आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे १८,५७३ देणगीदारांकडून चार जिल्ह्यांतील ४०० ड्रॉप बॉक्सद्वारे निधी जमा करण्यात आला असून सर्व देणगीदारांची माहिती उपलब्ध नसल्याने त्याची सखोल पडताळणी सुरू आहे. विविध खात्यांमधून रक्कम काढून इतरत्र वळवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. निधीचा वापर कोणत्या कारणांसाठी करण्यात आला, तसेच त्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी केली जात आहे.

या प्रकरणातील प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यासाठी एटीएसकडून समांतर तपास सुरू असून, आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, संबंधित संस्थेच्या नावाखाली विविध कारणे सांगून नागरिकांकडून सुमारे ४.७३ कोटींची रक्कम जमा करण्यात आली. ट्रस्ट माजलगाव येथे स्थापन करण्यात आला असला तरी बँक खाते लातूर येथील अॅक्सिस बँकेत उघडण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. ट्रस्टमार्फत आणखी कोणते गैरप्रकार झाले आहेत का, याची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes