SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्नकोल्हापूर महापालिकेसमोर खेळणी रचून 'आप'चे आंदोलन; उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणीशक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज ऑनलाईन राज्यव्यापी बैठकतेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशभारताच्या सैन्यदलाला सलाम ! जयहिंद !!निकालानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची मोफत सेवाडीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना एआयसीटीई, दिल्लीकडून मान्यता; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस सुवर्णसंधी

जाहिरात

 

अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार...

schedule27 Jul 23 person by visibility 1841 categoryराज्य

कोल्हापूर : अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आभार मानले आहेत. अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग एका दिवसात पंधरा हजार क्यूसेक्सवरून पावणेदोन लाख क्यूसेक्सपर्यंत वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. आमदार पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना फोन करून याची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले. त्यामुळे पंचगंगा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रमाणात वाढ होऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभाव्य पुरस्थिती निर्माण झाली. 2019 आणि 2021 मध्ये पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते.

 या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी ( २६ जुलै) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सविस्तर पत्र पाठवून अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत विनंती केली होती .

 त्याचबरोबर विधान परिषदेतही याबाबत प्रश्न उपस्थित करून अलमट्टीतील होणारा पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी केली होती. 

या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून होणारा विसर्ग कर्नाटक सरकारने वाढविला. बुधवारी २६ जुलै अलमट्टी धरणातून १५ हजार क्यूसेक्स इतका विसर्ग होत होता तो तो आज गुरुवार २७ जुलैपर्यंत पावणेदोन लाख क्यूसेक्स इतका करण्यात आला.
त्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडे होऊन सुद्धा पंचगंगेची पाणी पातळी अत्यंत संथपणे वाढत होती.त्यामुळेच गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत पंचगंगा पाणी पातळी ४० फूट ८ इंचापर्यंतच गेली.

या सर्व गोष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पुरापासून दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes