SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
श्री जोतिबा डोंगरावर ‘दख्खन केदारण्य’ प्रकल्पांतर्गत वृक्ष पुनर्रोपणास सुरुवात; दोन हजार झाडांना मिळणार नवजीवनमुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरूपेटंटचे ‘स्टार्टअप’ मध्ये रूपांतर होणे अत्यंत महत्वाचे : डॉ. मोहन वनरोट्टीशिवसेनेचा उद्या दि.१९ रोजी "मिशन महानगरपालिका" इच्छुक उमेदवार, पदाधिकारी मेळावा : आमदार राजेश क्षीरसागरभाजपाचे नूतन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांना खासदार महाडिक यांनी दिल्या शुभेच्छासंजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध‘पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीरदंतवैद्यक महाराष्ट्र राज्य संघटनेत डॉ. अभिजित वज्रमुष्टी, डॉ. दिग्विजय पाटील पदाधिकारीसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्स मध्ये घवघवीत यशकोल्हापूर पंचगंगा नदी घाट येथे पाय घसरून पाण्यात पडलेल्या वृद्ध महिलेला जीवदान

जाहिरात

 

अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मानले आभार...

schedule27 Jul 23 person by visibility 1954 categoryराज्य

कोल्हापूर : अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आभार मानले आहेत. अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग एका दिवसात पंधरा हजार क्यूसेक्सवरून पावणेदोन लाख क्यूसेक्सपर्यंत वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. आमदार पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना फोन करून याची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले. त्यामुळे पंचगंगा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रमाणात वाढ होऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभाव्य पुरस्थिती निर्माण झाली. 2019 आणि 2021 मध्ये पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते.

 या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी ( २६ जुलै) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सविस्तर पत्र पाठवून अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत विनंती केली होती .

 त्याचबरोबर विधान परिषदेतही याबाबत प्रश्न उपस्थित करून अलमट्टीतील होणारा पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी केली होती. 

या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून होणारा विसर्ग कर्नाटक सरकारने वाढविला. बुधवारी २६ जुलै अलमट्टी धरणातून १५ हजार क्यूसेक्स इतका विसर्ग होत होता तो तो आज गुरुवार २७ जुलैपर्यंत पावणेदोन लाख क्यूसेक्स इतका करण्यात आला.
त्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडे होऊन सुद्धा पंचगंगेची पाणी पातळी अत्यंत संथपणे वाढत होती.त्यामुळेच गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत पंचगंगा पाणी पातळी ४० फूट ८ इंचापर्यंतच गेली.

या सर्व गोष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पुरापासून दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes