+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule04 Jul 24 person by visibility 293 categoryगुन्हे
इचलकरंजी : घोडागाडी शर्यतीच्या वादातून शहापूर येथील शाळेच्या पाठीमागे सुशांत दीपक कांबळे (वय १८, रा. आसरानगर, इचलकरंजी) या युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केलीअसून या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

अतिश दत्तात्रय नेटके (१९, रा. सहकारनगर), आर्यन सरदार चव्हाण (२१, रा. गणेशनगर) व प्रदीप पारद यादव (२०, रा. जेकेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 शहापुरातील विद्यामंदिर क्र. ४३ या शाळेच्या मागे गुरुवारी सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याचे आढळले.

पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलवरून मृताची ओळख पटली. पंचनामा करून मृतदेहविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठविला. त्यानंतर शहापूर पोलिस आणि कोल्हापूर एलसीबीच्या पथकाने मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. तपासामध्ये मोबाइल लोकेशनवरून संशयित कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असल्याचे समजले. त्यानुसार कारवाई करत संयुक्त पथकाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी त्यांच्यात घोडागाडी शर्यतीच्या कारणावरून झालेला वादातून हा खून केला असल्याचे संशयितांनी कबूल केले.