SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईकोल्हापूर : शिरोली जकात नाक्यातील जुना डिव्हायडर हटविण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरूकागल मधील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी माफ करावे : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलकेआयटी ‘बेस्ट नॉलेज सेंटर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित; आय.एस.टी.ई.च्या वतीने सन्मानकोल्हापूर : गुंठेवारी विकास अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर अखेर कोल्हापूर जिल्ह्यात 12 शेतकरी नोंदणी केंद्रे सुरुमंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती; सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींचे समर्पण ध्यान योग शिबीर संपन्नपुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा : राज्यपाल आचार्य देवव्रत; राज्यपालांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

जाहिरात

 

केआयटीकडे प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवान विद्यार्थ्यांचा ओढा; सर्वच शाखांच्या या वर्षीच्या कट ऑफ मध्ये लक्षणीय वाढ

schedule16 Aug 24 person by visibility 2401 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी राज्यभरातून अनेक गुणवान विद्यार्थ्यांचा प्रथम पसंतीचा ओढा दिसून येत आहे. राज्यभरातील उत्तम पर्सेंटाइल असणारे अनेक विद्यार्थ्यांनी केआयटीची निवड केली आहे. 

मेकॅनिकल, सिव्हील, सिव्हील अँड एन्व्हार्नमेंट, बायोटेक्नॉलॉजी यासारख्या मूळ शाखां कडे अधिक पर्सेंटाइल असणारा विद्यार्थी वळताना दिसून येत आहे.केआयटीने वरील मूळ शाखांमधील कोणत्याही एका शाखेची एकूण विद्यार्थी संख्या न घटवल्यामुळे केआयटी ला वरील चार विभागांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे.

 अधिक पर्सेंटाइल चे विद्यार्थी केआयटी ला प्रवेश घेत असल्यामुळे केआयटी च्या दर्जात्मक शिक्षणा वर पुन्हा एकदा शिक्का मुहूर्त स्वतः विद्यार्थ्यांनीच केलेले आहे असे मत संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या सर्व भागातून विद्यार्थ्यांनी केआयटीच्या सर्वच विभागांना प्रथम प्राधान्य क्रमांक दिल्यामुळे शहरी, ग्रामीण, निमशहरी विद्यार्थी या व अशा अनेक गुणवान विद्यार्थ्यांचे प्रवेश केआयटीमध्ये आगामी काळातही होतील अशा प्रकारची अपेक्षाही संस्थेचे नूतन अध्यक्ष साजिद हुदली यांनी व्यक्त केली.

प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी केआयटी परिवारातर्फे स्वागत व अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes