SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीई च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २३ विद्यार्थ्यांची डॅनफॉस कंपनीत निवडकोल्हापुरात स्वर्गीय राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनजिल्हास्तरीय लोकशाही दिनात 163 अर्ज प्राप्तकिसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर कोंडेकर आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकार्यकर्त्यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान मारलय, आता येणाऱ्या निवडणुकीच मैदान मारण्यासाठी सज्ज रहावे; आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहनजैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु : मंगलप्रभात लोढा; जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटननूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात जल्लोषी स्वागतशेती केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार : उपमुख्यमंत्री अजित पवारजग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक

जाहिरात

 

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

schedule20 May 25 person by visibility 317 categoryराज्य

पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर (वय ८६) यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. डॉ. नारळीकर झोपेतच निधन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते, मात्र वयोमानानुसार प्रकृती काहीशी खालावली होती.

डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते त्यामुळे जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली

डॉ जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना 'पद्मभूषण' आणि पद्मविभूषण' हा सर्वोच्च सन्मान देखील मिळाला.

 'चार नगरांतले माझे विश्व" या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार,'यक्षाची देणगी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार तसेच अन्य विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes