+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule05 Aug 24 person by visibility 808 categoryविदेश
ढाका : बांगलादेशमध्ये गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या प्राणघातक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

यामुळे हसिना ढाका सोडून सुरक्षित स्थळी गेली आहे. त्याचवेळी रॉयटर्सने वृत्त दिले आहे की पंतप्रधान हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्या आहेत. शेख हसीना आपल्या बहिणीसह पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 'गणभवन' सोडून सुरक्षित स्थळी गेल्या आहेत.

गेल्या एक महिन्यापासून बांगलादेश हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच आंदोलन दडपण्यासाठी देशात इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. गोळीबारासोबतच महामार्ग आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 14 पोलिसांसह सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात हजारो लोक जखमी झाले आहेत.