SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा; शेख हसीना देश सोडून भारतात दाखल

schedule05 Aug 24 person by visibility 1150 categoryविदेश

ढाका : बांगलादेशमध्ये गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या प्राणघातक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

यामुळे हसिना ढाका सोडून सुरक्षित स्थळी गेली आहे. त्याचवेळी रॉयटर्सने वृत्त दिले आहे की पंतप्रधान हसीना लष्करी हेलिकॉप्टरने भारताकडे रवाना झाल्या आहेत. शेख हसीना आपल्या बहिणीसह पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 'गणभवन' सोडून सुरक्षित स्थळी गेल्या आहेत.

गेल्या एक महिन्यापासून बांगलादेश हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच आंदोलन दडपण्यासाठी देशात इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. गोळीबारासोबतच महामार्ग आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 14 पोलिसांसह सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात हजारो लोक जखमी झाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes