SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रभागाच्या सर्वांगीण संतुलित विकासाचे ध्येय बाळगणाऱ्या ओंकार जाधव यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद; महिलांची प्रचार फेरीकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 : आलिय नासिर गोलंदाज यांची प्रचारामध्ये आघाडी; मतदारांचा वाढता प्रतिसादसत्यजित जाधव, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात गती; मतदारांकडून वाढता प्रतिसादआरटीई 25 टक्के ऑनलाईन विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणी सुरुपदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 12 जानेवाला प्रसिध्दअभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील 72 विद्यार्थी रवानानाविन्यपूर्ण योजनेतून राज्यातील पहिलाच उपक्रमडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्धनदी हाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू : मनोज बोरगावकरसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर; ६० विद्यार्थ्यांची थेट निवडउत्तम काम भक्कम नेतृत्व; प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपचे उत्तम पाटील यांना वाढता प्रतिसाद

जाहिरात

 

महात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ

schedule19 Mar 25 person by visibility 549 categoryसामाजिक

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाले अंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.

डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.

डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल, संशोधक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes