SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर : नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेडीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदानगार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शनडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजनतपोवन मैदानावर उद्यापासून सतेज कृषी प्रदर्शनाला होणार प्रारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार उद्घाटन ,तीन फुटाची राधा नावाची म्हैस असणार खास आकर्षणकोल्हापूर महानगरपालिकेच्या भाडेतत्त्वावरील डांबरी प्लॅंटद्वारे विभागीय कार्यालय क्रं.2 अंतर्गत पॅचवर्कची कामे सुरुजागतिक मृदा दिनानिमित्त चला माती समजून घेऊया शेती समृद्ध करुया उपक्रमाचे आज जिल्ह्यात आयोजनकोल्हापूर: चिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागूचंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

महात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ

schedule19 Mar 25 person by visibility 502 categoryसामाजिक

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाले अंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.

डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.

डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल, संशोधक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes