SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हूबळी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकर उपविजेता31 मार्चपूर्वी 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा : प्रशासक के. मंजूलक्ष्मीडीवायपी साळोखेनगर इंक्युबेशन सेंटर येथे ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्नडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहातकोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रेभारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात सामाजिक भान... ' एकटी ' संस्थेचा आजोबांना ' आधार 'कळंबा तर्फे ठाणे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहणदेशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत उपक्रमाची विश्वविक्रमी नोंद; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहितीभारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील; प्रजासत्ताक दिन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

जाहिरात

 

महात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ

schedule19 Mar 25 person by visibility 560 categoryसामाजिक

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाले अंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.

डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.

डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल, संशोधक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes