SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जागतिक लोकसंख्या दिन: प्रगती आणि आव्हानांचा समतोल साधण्याची संधी!शिरोळ तालुक्यात विविध शासकीय योजनांचा आढावासरकारला आरसा दाखवणे म्हणजे 'महाराष्ट्रद्रोह' नव्हे; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघाती हल्ला!योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री : ‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन; डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन कसबा बावडा पंप हाऊस येथील दुरुस्ती मुळे ई वॉर्डचा १३ जुलैला पाणीपुरवठा बंदशहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर रूपाराणी निकमराजूर ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन सुधारित प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

आर्थिक क्षेत्रात ए आयचे महत्त्व वाढणार : डॉ.अनिश कुमार; घोडावत विद्यापीठातील एमबीए विभागात व्याख्यान संपन्न

schedule21 Feb 24 person by visibility 659 categoryशैक्षणिक

अतिग्रे : जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात ए आय चे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) महत्त्व वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन बी एन वाय मिलोन इंडियाचे माजी कार्यकारी संचालक डॉ.अनिश कुमार यांनी केले. ते संजय घोडावत विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत बोलत होते.

 यावेळी माजी टीव्हीएस इन्फ्रास्ट्रक्चर चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभ्रता घोषाल यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना बँकिंग आणि अर्थक्षेत्रातील नोकऱ्यां मधील नवीन संधी विषयी सखोल माहिती दिली. तसेच या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहावर भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागाच्या अधिष्ठाता डॉ योगेश्वरी गिरी यांनी केले. त्या म्हणाल्या की विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्यशाळा व तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.

 या कार्यक्रमासाठी डॉ.विश्वास पेंडसे, डॉ. रेवती देशपांडे यांनी कष्ट घेतले. तर विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी मार्गदर्शन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes