SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये विक्रमी उत्साह : शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणार : इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेकेंद्र सरकारच्या कायद्यानुसार मॅट्रीमोनी वेब साईट्सनी शासनाला माहिती देणे बंधनकारक : गृह राज्यमंत्री योगेश कदमकेन्द्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते अथानी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या २५ फूट उंच पुतळ्याचे अनावरणशनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहार प्रकरणी दोन कर्मचारी अटकेत : गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरसातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण; दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना पंधरा दिवसांची मुदत : मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेभाऊ पाध्ये काळाच्या चौकटी तोडणारा लेखक : श्रीराम पवारडाक पुरस्कारार्थी हे देशाचे नवरत्न : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

जाहिरात

 

आर्थिक क्षेत्रात ए आयचे महत्त्व वाढणार : डॉ.अनिश कुमार; घोडावत विद्यापीठातील एमबीए विभागात व्याख्यान संपन्न

schedule21 Feb 24 person by visibility 439 categoryशैक्षणिक

अतिग्रे : जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात ए आय चे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) महत्त्व वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन बी एन वाय मिलोन इंडियाचे माजी कार्यकारी संचालक डॉ.अनिश कुमार यांनी केले. ते संजय घोडावत विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत बोलत होते.

 यावेळी माजी टीव्हीएस इन्फ्रास्ट्रक्चर चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभ्रता घोषाल यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना बँकिंग आणि अर्थक्षेत्रातील नोकऱ्यां मधील नवीन संधी विषयी सखोल माहिती दिली. तसेच या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहावर भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागाच्या अधिष्ठाता डॉ योगेश्वरी गिरी यांनी केले. त्या म्हणाल्या की विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्यशाळा व तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.

 या कार्यक्रमासाठी डॉ.विश्वास पेंडसे, डॉ. रेवती देशपांडे यांनी कष्ट घेतले. तर विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी मार्गदर्शन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes