SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजयबाबा घाटगेंनी स्वीकारले भाजपाचे प्राथमिक व सक्रिय सदस्यत्व; कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा कार्यालयाला दिली भेटमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजलीमनरेगा अंतर्गत भूजल पातळी वाढीसाठी ५० हजार ‘जलतारा’ (शोषखड्डे) निर्माण करून आदर्श मॉडेल तयार करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेपहलगाम दहशतवादी हल्ला: सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा, दहशतवादाविरुद्ध देश एकजूट महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखलमहर्षी वि.रा. शिंदे क्रांतीकारी लोकोत्तर व्यक्तीमत्त्व: राजन गवस; प्रा. एन.डी. पाटील लिखित महर्षींवरील पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशनसांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठककोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक पदाचा प्रवीण टाके यांनी स्विकारला पदभारपाणी पुरवठा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी उत्तम जाधव, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र येळवडेराष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह : कोल्हापुरात आरोग्य तपासणी शिबिराचा ६६ जोडप्यांनी घेतला लाभ

जाहिरात

 

गावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते ‘जलरथा’चे उद्घाटन

schedule24 Apr 25 person by visibility 222 categoryराज्य

▪️शासकीय योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी बीजेएसचा पुढाकार

 कोल्हापूर : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनेचा गावागावात जाऊन प्रचार-प्रसार तसेच जनजागृती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या जलरथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. हा जलरथ प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे प्रत्येक गावात मागणीप्रमाणे जाणार असून या चित्ररथाव्दारे जिल्ह्यात 24 दिवस ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ याबाबत प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी स्वप्निल पवार, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शक्ती कदम, उपविभागीय जलसंधारण अधिकारी योगेश पोळ, सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी संतोष पाटील, जिल्हा प्रकल्प समन्वयक अनिकेत कदम, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी व जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील 10 स्वयंसेवी संस्था यामध्ये काम करणार आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार  आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेद्वारे शासन गावागावातील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत किंवा पात्र स्वयंसेवी संस्थेला या कामासाठी अर्ज करुन जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येणार आहे. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.

शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकऱ्यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनजागृती करुन जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्या अनुषंगाने जलरथाची निर्मिती करण्यात आली असून तो जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार-प्रसार करणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड अॅप’ वर ऑनलाईन भरायचा आहे. बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे. योजनेची सर्व माहिती ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ म्हणजेच ‘www.shiwaar.com’ या शासनाच्या पोर्टलवर दिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचालाभ घ्यावा, असे आवाहन बीजेएसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes