SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज“भुजबळ नाराज असतील तर राजीनामा द्यावा” संजय राऊतांचा टोलामुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला; ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदलसैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणज्येष्ठांसाठी ग्रामपंचायतींमध्येही विरंगुळा केंद्रांची होणार निर्मितीकोल्हापूरात तृतीयपंथीयांसाठी होणार स्वतंत्र समुपदेशन केंद्र; जिल्हास्तरीय बैठकीत धोरण अंमलबजावणीवर चर्चाअनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनाग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर'पीएसआय' पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू; राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला यशनमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणार

जाहिरात

 

“भुजबळ नाराज असतील तर राजीनामा द्यावा” संजय राऊतांचा टोला

schedule04 Sep 25 person by visibility 154 categoryराज्य

मुंबई  : छगन भुजबळ हे मराठा आरक्षणावरील जीआरविरोधात न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. त्याचबरोबर ते अलीकडील मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित होते. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत म्हणाले, "भुजबळ नाराज असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. आपल्या समाजावर अन्याय होत असेल आणि आपण त्या समाजाचे नेते असाल, तर मंत्रिपदावर राहणे योग्य नाही." ते पुढे म्हणाले, "इतिहासात तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी नेहरूंशी मतभेद झाल्यावर तात्काळ राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे भुजबळांनीही स्वाभिमान आणि नैतिकतेला धरून निर्णय घ्यावा."

मराठा आंदोलकांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवा शासन निर्णय काढला आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे भुजबळ सरकारवर नाराज असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.

संजय राऊत पत्रकार परिषदेत आज म्हणाले, “खरतर छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. ते ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लक्ष घालून मंत्रिमंडळात घ्यायला सांगितले. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्देश दिले होते. भुजबळ आज मंत्री आहेत ही काही अजित पवारांची त्यांचावर कृपा नाही, ही तर पंतप्रधान मोदी यांची कृपा आहे. कारण मोदी हे स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात. मी ओबीसी आहे, मी ओबीसींचा सर्वात मोठा नेता आहे असं ते समजतात. मुळात कुठल्याही पंतप्रधानाच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही. परंतु, मोदीजी जातीची भाषा बोलत असतात.”

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes