+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule27 Jul 23 person by visibility 1693 categoryराज्य
मुंबई: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी राबवलेल्या प्रोत्साहन पर अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील ११०२२ शेतकरी वंचित राहिले असून हे अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी आमदार पी.एन . पाटील सडोलीकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. यावरील लेखी उत्तरात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे अनुदान देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून लवकरच हे अनुदान दिले जाईल असे लेखी आश्वासन दिले . 

 राज्य शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेपासून नियमित कर्ज फेड करणारे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान द्यावे; अशी मागणी राज्यात सर्वप्रथम आ . पी .एन . पाटील यांनी केली होती .ही मागणी राज्य शासनाने मान्य करत राज्यात प्रोत्साहन पर अनुदान योजना राबवली आहे .मात्र अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत . 

 यात कोल्हापूर जिल्ह्यातील ११०२२शेतकऱ्यांचा समावेश असून ४० कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळणार की नाही? याबाबत संभ्रमावस्था आहे .राज्यातील जिल्हा बँकांतून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करूनही त्यांना लाभ मिळालेला नाही हे खरे आहे काय? असा प्रश्न करत या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देऊन त्यांच्यावर अन्याय दूर करावा असा लेखी तारांकित प्रश्न पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता .

 त्याच्या लेखी उत्तरात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील विविध बँकांनी नियमितपणे कर्जफेड केलेल्या २८लाख ८४ हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केलेले आहेत त्यापैकी प्रत्यक्षात १४ लाख१४ हजार खात्यांना ५१३२कोटी रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान वर्ग केलेले आहे व उर्वरित अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे असे उत्तर दिले .कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदानाकडेलक्ष लागलेले आहे . आ .पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे .