SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय जनता पार्टीच्यावतीने गटनेता निवड प्रक्रिया पूर्णउल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 26 जानेवारीला शाळांमध्ये साक्षरता शपथडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ‘वज्र’ उपकरणाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागरपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे प्रजासत्ताक दिनी वितरणराजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ग्रंथभेट योजनेसाठी ग्रंथ सादर करण्याचे आवाहनपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभसर्व उमेदवार निवडून आणून गुलाल लावूनच तुमच्यापाशी येऊ : ए वाय पाटील; राधानगरी तालुका काँग्रेसचा निर्धार प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यातून मिळतोय जलद न्याय..! ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकारशिवाजी विद्यापीठाचे समाजाशी विश्वासार्हतेचे नाते: डॉ. ज्योती जाधव

जाहिरात

 

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 26 जानेवारीला शाळांमध्ये साक्षरता शपथ

schedule23 Jan 26 person by visibility 51 categoryराज्य

कोल्हापूर : केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेश दिले असून हा कार्यक्रम सन 2022 ते 2027 या कालावधीत अंमलात आणण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय तसेच शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गाव व साक्षरता शपथ घेण्यात यावी, जेणेकरून 100 टक्के साक्षर महाराष्ट्र घडविण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes