SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेपुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समितीसरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढविनापरवाना आरायंत्र व मशिनवर वनविभागाची कारवाई23 नोव्हेंबरला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाआदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करत निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात प्रक्रिया राबवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेधैर्यशील भोसलेची चेन्नई येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडबिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू, , मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरणजिल्ह्यात शिदेसेनेला चांगले यश मिळेल : एकनाथ शिंदे; शिंदेसेनेच्या गटप्रमुखांचा कोल्हापुरात मेळावा

जाहिरात

 

आधुनिक जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर सर्व शासकीय विभागांनी करावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule02 Apr 24 person by visibility 409 categoryराज्य

कोल्हापूर : आधुनिक जीआयएस पोर्टलचा उपयोग विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये समन्वय साधून कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच योग्य नियोजन, अचूक निर्णय घेण्यासाठी, जिल्ह्याची आर्थिक वाढ आणि विकासाला गती देण्यासाठी करा, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. पीएम गति शक्ती - नॅशनल मास्टर प्लान अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे संपन्न झाली. नियोजन विभाग व महाराष्ट्र सुदूर संवेदन उपायोजना केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी डॉ. अशोक जोशी संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपायोजना केंद्र, नागपूर, डॉ. स्मिता धिरडे, गार्डियन सायंटिस्ट तसेच विजय पवार जिल्हा नियोजन अधिकारी, अमित सुतार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, डॉ. अरुण धोंगडे, जिल्हा संसाधन सल्लागार, जिल्हा विकास आराखडा व इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करावा. या पोर्टलमूळे योजनांची अंमलबजावणी करताना अचूकता मिळणार आहे. महसूल मिळवतानाही या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या मनोगतामधे सांगितले. पुढच्या वर्षीपासून जीआयएसचा वापर अनिवार्य करा अशा सूचनाही त्यांनी नियोजन विभागाला दिल्या. यासाठी शहरातील महाविद्यालय व तेथील विद्यार्थ्यांची या तंत्रज्ञानासाठी मदत घ्यावी असे ते म्हणाले. यावेळी रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी, वेळेवर आणि अचूक माहिती प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जीआयएस तंत्रज्ञानचा उपयोग हा विभाग निहाय नियोजन व अंमलबजावणी साठी करावा असे आवाहन श्री. विजय पवार यांनी केले. रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तसेच आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीवर जास्तीत जास्त परिणाम सुनिश्चित करण्यासाठी समक्रमित नियोजन आणि अंमलबजावणी महत्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यशाळेत जिल्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नियोजन प्रक्रियेत रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्सचा निगडीत विभाग निहाय डेटा लेयर चे प्रशिक्षण देण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes