+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule23 Jul 23 person by visibility 880 categoryविदेश
नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये झालाकाठी सदरमधील छत्रकांडा भागात बसचा भीषण अपघात झाला असून आज सकाळी शनिवारी एक बस थेट तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातात मृत झालेले लोक हे पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झलकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बस पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता निघाली होती. त्यानंतर बसबारिशाल खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10 वाजता येताच रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली आणि हा अपघात झाला.

 तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने तळ्यात पडल्यानंतर बस पाण्यात बुडाली. बस पडल्यानंतर काही प्रवासी पोहून बाहेर आले आणि आपला जीव वाचवला मात्र यामध्ये 17 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत स्थानिक प्रशासन नागरिकांनी बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला.