SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देऊ : दिपक चव्हाण; शिवसेनेच्या वतीने दीपक चव्हाण यांचा निवडीबद्दल सत्कारबालविवाह मुक्त जिल्ह्यासाठी आढावा बैठक संपन्नप्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतकेआयटी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘आयडियाथॉन’ ची सांगता, ७१ इनोव्हेशन व सृजनशी कल्पनांचे तरुणाईकडून सादरीकरणसंजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहातआद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके: भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकारघोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाकेशिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमच 'माझे विद्यार्थी, माझे उद्योजक' माजी विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करारभीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांकपर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य

जाहिरात

 

पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देऊ : दिपक चव्हाण; शिवसेनेच्या वतीने दीपक चव्हाण यांचा निवडीबद्दल सत्कार

schedule17 Feb 26 person by visibility 149 categoryसामाजिक

कोल्हापूर : संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष पदावर निवड करून शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर  यांनी कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय दिला असून पदाच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय देऊ, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजना समितीचे नवीन अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केले.

 शिवालय, शिवसेना कार्यालय येथे युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना  चव्हाण यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उच्च पदावर संधी देण्याचे कामं करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असून संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पदावर माझी निवड होणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून समाजातील निराधार, गरजू आणि वंचित घटकांची सेवा करण्याची मोठी संधी आहे.

या पदामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे, त्यांना न्याय आणि आधार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने मी हे काम आणि समर्पित भावनेने पार पाडेन,असे सांगितले.

यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका  मंगल साळोखे,उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे,रमेश खाडे,उदय भोसले,शहर समन्व्यक सुनिल जाधव, जिल्हा समन्वयक कमलाकर जगदाळे, महिला आघाडीच्या पूजा भोर,शहरप्रमुख  सिद्धी रांगणेकर,  अमरजा पाटील, प्रीती अतिग्रे,  मंगल कुलकर्णी, राधिका पारखे,सौ. पूजा कामते,देवेंद्र खराडे,सनी अतिग्रे,सुरेश माने,किरण पाटील,सुशील भांदिगरे,अविनाश कामते,बाळासाहेब शेलार,अर्जुन संकपाळ,कपिल नाळे,जयदीप सरवदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes